पुणे- शहरात अनेक ठिकाणी रस्ते ,गटारे ,पदपथ अर्धवट खोदून त्यांची कामे लॉकडाऊन मुळे आणि अर्थसंकल्पीय समस्येमुळे तशीच अर्धवट सोडून देण्यात आली आहेत ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. आता पावसाळा येईल, तुमची तांत्रिक समस्या काय असतील त्या शासकीय पातळीवर जरूर सोडवा पण रस्त्यावर परिस्थिती अशीच अर्धवट ठेवू नका ती कामे तातडीने पूर्ण करा अशी मागणी क्रिएटीव्ह फौंडेशन चे संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे
या निवेदनात असे म्हटले आहे कि, मी केलेल्या मागणीनंतर आपण विकासकामे पूर्ण करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत मुदतवाढ दिली होती.मात्र Lockdown १७ मे पर्यंत वाढविण्यात आल्यानंतर विकासकामां बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याचे समजते.केवळ पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई व इतर कामे सुरु करण्यात आली आहेत.मात्र अनेक ठिकाणी रस्ते / पदपथ खणलेल्या अवस्थेत आहेत.अनेक ठिकाणी ड्रेनेज वा बांधकाम अशी विकासनिधीतील अनेक कामे अर्धवट स्थितीत असल्याने पावसाळ्यात याचा नागरिकांना मोठा त्रास भोगावा लागण्याची शक्यता आहे.सध्या आपण ग्रीन झोन मधे लॉकडॉउन शिथिल केले आहे.अश्या सर्व भागातील अर्धवट स्थितीतील कामे युद्धपातळीवर पूर्ण करुन घेतल्यास नागरिकांना मन:स्ताप होणार नाही.तरी लॉकडॉउन काळातील सर्व नियम पाळून अर्धवट विकासकामे पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती