पुणे- ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील मनसेची वाघीण म्हणून ओळखली जाणारी माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी मनसे का सोडली ? या प्रश्नाचे खरे उत्तर अजूनही मिळू शकलेले नाही . घरात दोनच कर्त्या व्यक्ती असतात पण देखावा मात्र ४/५ व्यक्ती करत असतात आणि अशा स्थितीतही जे घर चालवितात त्यातील एकाने घर सोडून जावे अशी पुण्यातील मनसेची अवस्था झाली आहे. नेतृत्वातील आपसातील रस्सीखेच या मागे कारणीभूत आहे कि ,अन्य काही कारण आहे ? असे अनेक प्रश्न यामुळे राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत . मनसे सोडल्यावर त्या कुठल्या पक्षात जातील या पेक्षा त्यांनी पक्ष का सोडला हा प्रश्न मनसे च्या कार्यकर्त्यांनाच नाही तर मनसे च्या जे काही असतील त्या चाहत्यांनाही भेडसाविणार आहे . आता शहरात त्यांच्या नंतर त्यांची उणीव भरून काढणारी दुसरी कोणी महिला कार्यकर्ती आहे काय ? याकडेही लक्ष वेधले जाणार आहे .
सभांना प्रचंड गाजविणारा, सोशल मिडियातून अफाट प्रसिद्धी मिळविणारा हा पक्ष कधीही आपली हीच ताकद मतांमध्ये परावर्तीत करू शकलेला नाही त्यामुळे कोणत्याही स्तरावरून गोर गरीब आणि प्रामाणिक माणसापर्यंत किती खोलवर रुजला ? कि अफाट माया गोळा करण्यासाठी संसारे उधवस्त करणारे धंदे किंवा बेकायदा बांधकामे करणारे यांनी काबीज करून ठेवलाय ? अशा विविध प्रश्नांचा खल रुपाली पाटलांच्या प्रश्न सोडण्याने निर्माण होत आहेत .
पुण्यात जेव्हा मनसे ने सुरुवातीलाच भरारी घेतली तेव्हाचे अनेक जण आता प्रवाहात दिसत नाहीत अर्थात आता ती माणसे ला आत्ता किरकोळ वाटत असली तरी त्यांनीच मनसेचे हे नेते येथे घडविले होते आणि तेच नेते आपल्याला , नेता बनविणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर सारत नव्यांना स्वीकारत , कधी बदल घडवीत स्व वर्चस्व मात्र कायम राखत आले . आणि आपल्याहून मोठा इथे कोणी नको या वर्चस्वातून रुपाली पाटलांची घुसमट झाली काय ? असा हि प्रश्न उपस्थित होतोच आहे. महापालिका गाजविणारी , शहरातील काय राज्यातील महिलांची भक्कम आघाडी निर्माण करणारी रुपाली पाटील यांच्या जाण्याने मनसे नेतृत्वाने काहीही म्हटले तरी मनसे ला नुकसान तर सहन करावे लागणारच आहे. पण मनसे ला अजूनही यापुढेही आपल्यात असे कार्यकर्ते टिकवून ठेवता येतील काय ? असेही प्रश्न या निमिताने पुढे यत आहेत .
आगामी महापालिका निवडणुकीत रुपाली पाटलांना स्वतःचेच काय अन्य महिला/ पुरुष कार्यकर्त्यांसाठी मनसेची उमेदवारी मिळविणेही कठीण नव्हते आणि त्या ज्या पक्षात जाणार असतील तिथे हि त्यांना उमेदवारी मिळणार आहेच .त्यांना त्यांच्या राजकीय परिस्थितीत पक्ष बदलाने काही विशेष फरक पडेल असा दावा कोणी करतही नाही . मग त्यांनी पक्ष का सोडला ? या प्रश्नावर जास्त भर दिला जाऊ शकणार आहे .