पुणे- बिबवेवाडी धनकवडी पुनर्वसन प्रकल्पातील घरे हस्तांतराचा माझा प्रस्ताव महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंजूर केल्याने याबाबत चे श्रेय माझे आणि भाजपचेच आहे ,असे असताना काही अन्य पक्षातील नगरसेवक या प्रकरणाचे श्रेय लाटण्यासाठी दिशाभूल करणारा प्रचार करीत असल्याचा आरोप आज भाजपच्या नगरसेविका रुपाली दिनेश धाडवे यांनी येथे केला. ज्याची पाठराखण महापौरांसह स्थायी समिती अध्यक्षांनी देखील केली असून मंजूर झालेला प्रस्ताव हा धाडवे यांनीच दिला होता , आणि जनहितासाठी च तो आम्ही मंजूर केला असल्याचे स्पष्ट केले आहे.
धाडवे यांनी असे म्हटले आहे कि , १९८५ मध्ये अस्तित्वात आलेल्या या पुनर्वसन प्रकल्पातील घरांचे हस्तांतरण २०१० पासून महापलिका प्रशासनाने थांबविले होते . त्यामुळे प्रत्यक्ष येथे राहणाऱ्या कुटुंबाना रहिवासी ,मालकीहक्क पुरावे सादर करताना अनेक शैक्षणिक व घरगुती कामासाठी अडचणी निर्माण होत होत्या . माजी नगरसेवक दिनेश धाडवे यांनी या साठी सातत्याने प्रयत्न केले होते . २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर याबाबत आपण प्रयत्न सुरु केले , आपण याबाबत प्रस्ताव दिला ज्यावर स्थायी समितीने प्रशासनाचा अभिप्राय मागवून मंजूर केला आहे. तथापि अन्य एका पक्षाच्या सभासदाने आपण प्रस्ताव दिल्याचे समजल्यानंतर तसाच प्रस्ताव २/३ दिवसानंतर दिला .आणि याच आधारे ते आपणच हे काम केल्याचा दावा करीत जनतेची दिशाभूल करीत आहेत .वास्तविक पाहता पालिकेचे दप्तर कोणीही तपासले तरी आपलाच प्रस्ताव मंजूर झाल्याचे स्पष्ट होईल . अन्य पक्षांच्या सभासदांनी आमचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये .
काय आहे हा प्रस्ताव
पुणे महापालिकेने आर्थिक दृष्ट्या दुर्बलघटकातील लोकांसाठी १९८४ -८५ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली आहे. यातील घरांची हस्तांतरण प्रक्रिया १९९६ सालापासून सुरु झाली .ती मार्च २०१० पर्यंत सुरळीत सुरु होती. यामुळे त्यावेळी पालिकेला दरमहा ३० ते ४० लाखाचे उत्पन्न मिळत होते . हि हस्तांतरण प्रक्रिया बंद झाल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान तर झालेच पण नागरिकांना शैक्षणिक आणि शासकीय कामात लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे अशक्य होऊन बसले त्यामुळे हि हस्तांतरण प्रक्रिया योग्य शुल्क आकारून ,शासन निर्णयाच्या अधीन राहून पुन्हा सुरु करावी .असा हा प्रस्ताव आहे .ज्याच्या सूचक रुपाली धाडवे आहेत आणि अनुमोदक राजेंद्र शिळीमकर आहेत .
काय आहे आयुक्तांचा अभिप्राय
बिबवेवाडी धनकवडी येथील जागांवर पुण्यातील मुठा उजवा कालवा काठच्या झोपडपट्टीवासियांचे साठी पुनर्वसन योजना राबविली आहे .जनता वसाहत ,दांडेकर पूल, डायस प्लॉट ,आंबील ओढा ,पर्वती पायथा येथील वसाहतींमधील झोपडीधारकांचे येथे पुनर्वसन करण्यात आले होते. ज्यात ६३९० घरे आणि ४३४ व्यावसायिक दुकाने आहेत .येथील मंजूर ओटा स्कीम मध्ये केवळ तळमजला न राहता आता प्लस दोन अथवा ३ मजले झालेले आहेत .८० ते ८५ टक्के ओट्यांवर वाढीव अतिक्रमणे झाली आहेत.योजना राबविताना ९९ वर्षाच्या भाडेपट्ट्याने पुनर्वसन करण्यात आले आहे. वाटप केलेय गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण आणि काही जागांवरील कोर्ट स्थगिती ,महारष्ट्र बँकेचा कमी झालेला सहभाग अशा कारणांनी १९९३ मध्ये हि योजना आटोपती घेण्यात आली .१९९६ मध्ये महापालिकेने निवासी गाळ्यांसाठी १०हजर रुपये आणि व्यापारी गाळ्यांसाठी 15 हजार रुपये घेऊन हस्तांतरास मान्यता दिली .पुढे ती 15 हजार रुपये आणि ३० हजार्रुपये अशी वाढविण्यात आली. मात्र हे हस्तांतार्ण देखील २०१० मध्ये थांबविण्यात आले. भुईभाडे २००८ च्या वाटप नियमावलीनुसार बाजार भावानुसार आक्रणे,हस्तांतर शुल्क निवासी गाल्यास ७५ हजार रुपये आणि व्यापारी गाल्यास दीड लाख रुपये आकारणे ,जे वाढीव बांधकाम अनुज्ञेय होऊ शकते ते रीतसर तडजोड शुल्क आकारून नियामान्वित करण्याचा प्रस्ताव मुख्य सभेच्या मान्यतेने शासनाकडे पाठविणे मिळकतकर आकारणी विभागाकडील धोरणानुसार आकारणी करणे अशा उपाय योजना आयुक्तांच्या अभिप्रायात सुचविण्यात आल्या आहेत.