पुणे- ‘त्या ‘शिर्डी साई संस्थान वरून बदलून पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर आल्या. पाहता पाहता तत्कालीन आयुक्तांचा विश्वास संपादन आणि अनेक खात्यांचा कारभार यामुळे त्या सातत्याने अग्रभागी राहिल्या ,राव गेले ,गायकवाड आले ,पुन्हा आता विक्रम कुमार आले ..पण ‘त्या अग्रभागी च राहिल्या . कोणीही नेता आला तर याच पुढे , चलती असलेल्या लॉबीचा सहारा यांनाच …मुख्य सभेत उत्तरे द्यायला याच पुढे … अशा महापालिका अतिरिक्त आयुक्त यापुढे ..वादाच्या भोवऱ्यात सापडल्या तर नवल वाटणार नाही अशी चर्चा आहे .
या चर्चेत देण्यात येणारी कारणे तशी दुर्लक्षित करता येण्याजोगी नाहीत .
गेल्यावर्षी आंबिल ओढ्याला पूर आला 5 लोक दगावले ..पण … प्र्शासनाने घेतलेली दक्षता अजूनही दिसली नाही .ओढ्याच्या रिटेनिंग वॉल च्या टेंडर संदर्भात भले भले अभ्यासक डोळे लावून आहेत .
६७ (३ ) क अन्वये दिलेल्या विशेष अधिकारात आताची कोरोना काळातील सर्व खरेदी यांच्याच अधिपत्याखाली होते आहे . तर अभ्यासकांच्या तोफा कालांतराने थंडावतील असा विश्वास असलेले महापौर मोहोळ हे त्यांना तोफेच्या तोंडी उभे राहण्यापासून वाचवीत आहेत ,पण कधी ना कधी त्यांना या अभ्यासकांच्या तोफेला सामोरे जायचे आहे . तत्पूर्वी त्यांच बदली सुद्धा होऊ शकेल असा हि काहीचा दावा आहेच .पण असे अयोग्य पाऊल राज्य शासन उचलेल असे हि अनेकांना वाटत नाही
विशेष म्हणजे आता आयटी,मिळकतकर अशी महत्वाची खाती त्यांच्याकडून नवे आयुक्त विक्रम कुमार यांनी काढून घेतली आहेत . स्मार्ट सिटी चा स्मार्ट कारभार हि त्यांच्या हातून निसटला आहे. केवळ बांधकाम आणि आरोग्य विभाग त्यांच्या अखत्यारीत आहे
दक्षिण पुण्यासह पश्चिम पुण्यात काही नगरसेवकांनी उभारलेल्या बेकायदा बांधकाम प्रकल्पांकडे कानाडोळा करणे , त्या त्या भागातील बांधकाम निरीक्षकांच्या कारभारावर नियंत्रण न ठेवणे ,ओढे नाले बुजवून , डोंगर फोडून होणाऱ्या बांधकामांकडे दुर्लक्ष करणे हे साऱ्या पुणेकरांना ठाऊकच आहे.
आरोग्य खात्यात तर कहरच मांडलाय ..आंधळं दळतंय ..अशी परिस्थिती आहे. सीएसआर मध्ये येणाऱ्या संस्था आणि स्वतःच शोखी मिरविणाऱ्या संस्था यांच्यातच ‘त्यांना ‘ म्हणे वावरायला खूप आवडतंय ..आरोग्यप्रमुख म्हणे यांच्या अधिपत्याखाली टिकतच नाही . ते तर ते पण आता आम्हाला किमान वेतन द्या , किमान वेतन द्या असे ओरडू ओरडू सांगणारे आरोग्य सेवकांनी हि यांच्या ‘सबुरी’ पुढे माथा टेकला आहे. पण सुदैव यांचे कि त्यांनी रुग्ण सेवा सोडलेली नाही .
आता या सर्वावर ..’खरे खोटे देव जाणो ‘ असे म्हणायची वेळ लॉबी च्या बाहेरील लोकांवर आली असली तरी ..या लवकरच वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतील असा अभ्यासकांचा दावा आहे.