मुंबई-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रीमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात दाखल झाले या .बैठकीत पुण्याचे नामांतर जिजाऊनगर करा, अशी मागणी काॅंग्रेसने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या अगोदर देखील पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर असं करण्यात यावं अशी मागणी संभीजी ब्रिगेडकडून करण्यात आली होती.
राजकीय उलथापलथीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठकी वादळी ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून तीन नामांतराचे प्रस्ताव आणण्याची तयारी आल्याची माहिती देखील समोर आली आहे. या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बैठक सुरू होण्या अगोदर काँग्रेसचे दोन मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हे बैठकीतून निघून गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. ते का निघून गेले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
औरंगाबाद, उस्मानाबादसह नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचे प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवले जाणार आहेत. यामुळे ही बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. यात मुख्यतः काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी गुवाहाटीवरुन बंडखोर नेते एकनाथ शिंदे गट गोव्याकडे रवाना झाला आहे.