उद्यापासून शिवसेनेचे आंदोलन ;मिंधे सेनेला उत्तरे मिळतील
पुणे- रामदास कदम यांना पक्षाने मोठे केले परंतु त्यांनी पातळी सोडून पक्ष नेतृत्वावर टीका केल्याने त्यांच्या विरोधात पक्षाचा वतीने उद्यापासून आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.सध्या राजकारणात पातळी सोडून टीका सुरू आहे. सत्ता गेल्यावर उद्धव ठाकरे यांनी संयम सोडला नाही. वर्षा बंगल्यावरून राजीनामा देण्यास जाताना अथवा इतर सहकारी पक्ष सोडून जाताना त्यांनी कोणत्याही प्रकारे पातळी सोडून कोणावर टीका केली नाही.मात्र, भाजपकडून अफवांचे राजकारण सुरू असून त्याकरिता किरीट सोमय्या, मोहित कंबोज, नवनीत राणा यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे लोक ईडीचे प्रवक्ते सारखे बोलत असून त्यांना बोलण्याचे तारतम्य नाही अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
अंधारे म्हणाल्या, रामदास कदम हे सध्या निष्ठा बाबत बोलत आहे मात्र, इनामदारच्या निष्ठा किती आणि कितपत आहे हे आम्हाला माहिती आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाहीरपणे कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार होते असे सांगितले होते. दोन वेळा कदम यांनी पक्ष सोडण्याची भीती पक्षास घातली होती. सर्वांच्या कुंडली या आमच्याकडे आहे. आदित्य ठाकरे यांचे विवाह बाबत खालच्या पातळीची टीका करण्यात येत आहे. मिंधी सेना ही भाजपची स्क्रिप्ट बोलत असून अटल बिहारी वाजपेयी हे अविवाहित होते हे भाजपने विसरू नये. काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर वयक्तिक टीका करताना याचे भान राखावे.विरोधक याच्याकडे ध्येय धोरणवर बोलण्यावर मुद्दे नाही. रामदास कदम यांच्यासाठी पक्षाने गुहागर जागा सोडण्यासाठी मुंबईतील दोन पक्ष जागा सोडल्या होत्या. सरड्या सारखे रंग ते बदलत असून दिल्लीच्या आशीर्वादाने ते पुन्हा पक्ष नेतृत्वावर बोलत आहे.रश्मी ठाकरे यांची कधी राजकारणात लुडबुड नसते परंतु सामनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारताना त्यांना दूषणे देणे योग्य नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार कदम स्वतःला म्हणत असून मीनाताई ठाकरे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले ही बाब पातळी सोडून राजकारण केले जात असल्याचे दाखवून देणारी आहे. रामदास कदम विरोधात पक्षाकडून उद्यापासून आंदोलन केले जाणार आहे. शिवसेना सुसभ्य आणि सुसंस्कृत असून भित्री नाही कारण आम्ही जशास तसे उत्तर देतो. 32 वर्षाच्या पोराने तुमची झोप उडवली आहे त्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहे. पडझडीच्या काळात ही पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे. दसरा मेळावा होणार असून पक्ष प्रमुख जो आदेश देतील तो आमच्यासाठी शिरसवंध आहे.