पुणे– मोजके पदाधिकारी आणि मोजके अधिकारी दालनातून महापालिकेचा कारभार थट्टा मस्करी करत चालवीत असल्याने पुणेकरांना हाल अपेष्टांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप आज कॉंग्रेस चे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुणे हैराण झाले असताना या मागे केवळ प्रशासनाचा आणि ठराविक पदाधिकाऱ्यांचा बेफिफिकीरी पणा कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार हे माहिती असताना जणू काही कोरोना गेला ,तो पुन्हा येणार नाही अशा अविर्भावात सक्षम असलेली आरोग्य यंत्रणा या कंपूने विनाकारण काढून टाकली .ती आवश्यक त्या धर्तीवर सुरु ठेवली असती तर आज एवढी भयावह परिस्थिती नसती आणि आता ७० हजाराच्या वर ..विभागात लाखाच्या वर कोरोना ग्रस्तांची संख्या गेली तरी अजूनही पूर्ण क्षमतेने महापालिका नागरिकांना दिलासा देऊ शकलेली नाही . असे ते म्हणाले. नेमके अविनाश बागवे यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ऐका ….