पुणे-पीएमपीएल सेवा बंद न करता सुरू ठेवा या मागणीसाठी गिरीश बापट यांनी आज आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.ते म्हणाले,’ पीएमपीएल बंद झाली नाही पाहिजे. कारण हि पुण्याची रक्तवाहिनी आहे . अनेक सामन्य गरिबांच्या हाल अपेष्टा यामुळे वाढतील . या साठी पीएमपीएमएल च्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर बापट तसेच भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश येनपुरे , दीपक पोटे आदींनी आंदोलन केले . अखेरीस पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीतून घेऊन गेले .
पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) बससेवा तातडीने पूर्ववत करावी अन्यथा संपूर्ण शहरात स्थानिक पातळीवर जनआंदोलन तीव‘ करण्याचा इशारा शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष जगदीश मुळीक आणि खासदार गिरीश बापट यांनी आज दिला.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पीएमपीएमएलची बससेवा सात दिवसांपर्यंत बंद करण्याच्या महाविकास आघाडी अन्यायकारक निर्णयाविरोधात आज शहराध्यक्ष मुळीक आणि खासदार बापट यांनी पीएमपीएमएलच्या स्वारगेट येथील डेपो समोर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. पोलीसांनी दोघांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले.
शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, ‘राज्य सरकारने पीएमपीएमएलची बससेवा बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय आणि हालअपेष्टा करणारा आहे. एसटी आणि खासगी बसेसना एक न्याय आणि पीएमपीएमएलला वेगळा न्याय अन्यायकारक आहे. शहरात दररोज पाच लाख प्रवासी बससेवेचा वापर करतात. केवळ पाच रुपयांत प्रवास करता येतो. हातावर पोट असलेले नागरिक, कर्मचारी यांची गैरसोय होणार आहे. शहराची आर्थिक घडी बिघडणार आहे. रुग्णालये आणि आपत्कालिन सेवांवर परिणाम होणार आहे. लसीकरणाचा वेग मंदावणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. घरी एकट्याने परत जाणार्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे योग्य निर्बंध आणून बससेवा तातडीने सुरू करावी अन्यथा आंदोलन तीव‘ केले जाईल.’
खासदार बापट म्हणाले, ‘शासन आणि पोलीस यांचे नागरिकांच्या हिताच्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये हा केवळ शासनाचा प्रश्न तो जनतेचा ही आहे. म्हणून रुग्णालये ताब्यात घ्यावीत, ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यास आमचा पाठिंबा आहे. भाजपचे हजारो कार्यकर्ते मदतीला तयार आहेत. परंतु पीएमपीएमएल बंद करणे आणि संध्याकाळी सहा पासूनची संचारबंदी अन्यायकारक आहे. त्यामुळे ङ्गॅक्टरी, बँका, रुग्णालये, सरकारी कार्यालयातील सर्वसामान्य कर्मचार्यांची गैरसोय होणार आहे. पीएमपीएमएल हीशहराची रक्तवाहिनी आहे. ती बंद करू नये. निर्बंध आणा कोरोनाचे नियम पाळा परंतु बंद करू नका. शहराची अर्थव्यवस्था बिकट होणार आहेत. केवळ आपल्या हातात सत्ता आहे म्हणून आपल्याला पाहिजे ते नियम करू नयेत. बससेवा तातडीने पूर्ववत करावी.’