पुणे- टी व्ही 9 वृत्तवाहीनीचे पुण्यातील रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे. सलाम पुणे ,तसेच मायमराठी डॉट नेट च्या वतीने या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करून रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
मिळालेल्या माहितीनुसार त्याची अँटीजन टेस्ट निगेटिव्ह अली होती,त्यानंतर तो विश्रांतीसाठी गावी गेला,पुन्हा थोडी तब्येत बिघडली,तेव्हा swab टेस्ट केली,ती पोझिटिव्ह आली,मग कोपरगावच्या हॉस्पिटल मध्ये गेला,तिथे 40 हजार रुपये ऍडव्हान्स भरायला सांगितले,तेव्हा तिथे ऍडमिट न होता पुण्यात जम्बो हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाला.इथे प्रकृती खालावत गेली…खासगी हॉस्पिटल्स मध्ये व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध नव्हता.अखेर काल संध्याकाळी मंगेशकर मध्ये बेड उपलब्ध झाला.
तिकडे शिफ्ट करण्यासाठी कार्डियाक अम्ब्युलन्स हवी होती. ती पहाटेपर्यंत मिळू शकली नाही.जेव्हा मिळाली तोपर्यंत खूप उशीर झाला होता…..
दीड वाजता केला शेवटचा मेसेज
पांडुरंग यांची प्रकृती खालावली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास आधी पत्रकारांच्या एका ग्रुपवर पांडूरंग यांनी “मला वाईट वाटते, मला न्या” असा मेसेज केला होता. पत्रकारांनी त्यांना जंबोतून बाहेर काढून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात पोहचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण कुचकामी यंत्रणेमुळे योग्य उपचार मिळू न शकल्याने पहाटे मृत्यू झाला.
घटनाक्रम
– पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला.त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले.
– 27 ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी केली जी निगेटिव्ह आली.
– दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले. मात्र, तिथेही त्रास सुरू होता त्यामुळं त्यांची कोपरगावमध्ये अँटीजेन टेस्ट करण्यात आली जी पॉझिटीव्ह आली.
– रविवारी 30 जुलैला रात्री त्यांना अँम्ब्युलन्समधून उपचारांसाठी पुण्यात आण्यात आलं आणि पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमध्ये भरती केले. जंबो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर ‘आयसीयु’मध्ये उपचार सुरू होते. मात्र, त्यांची परिस्थिती खालावत होती. त्यामुळं त्यांना दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले.
– मंगळवारी रात्री 2 जुलैला त्यांची ऑक्सिजन पातळी 78 पर्यंत खाली गेली. त्यांना जंबो हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिअॅक अँम्ब्युलन्सची गरज होती. अशी अँम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रात्री अकरा वाजता अँम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण, त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर दुसरी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण, त्या अँम्ब्युलन्समध्ये डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत बारा- सव्वाबारा वाजले होते. पहाटे चारला अँम्ब्युलन्स मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला पण, तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.
– दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता अँम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आयसीयुमधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला. पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात कार्डिअॅक अँम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण, तोपर्यंत वेळ निघून गेली होती