पुणे- २० भारतीय जवानांना शहीदत्व प्राप्त झाले. ते लढले आणि हुतात्मे झाले .पण तरीही त्यांच्या शहीदत्वामागचे कारणही पंतप्रधान आणि सरकार सांगू शकत नाही .यामुळे अंतर राष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी देखील झाली . या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी तातडीने या देशाच्या जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे असे माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हटले आहे . शहिदांना सलाम या कार्क्रमचे आयोजन करून यावेळी शहर कॉंग्रेसच्या वतीने चायनाच्या हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या २० जवानांना आदरांजली वाहण्यात आली .
महापालिकेतील विपक्ष नेते आबा बागुल , कमल व्यवहारे ,सचिन आडेकर अभय छाजेड,लता राजगुरू, विठ्ठल थोरात ,एडविन रोबर्ट ,वीरेंद्र किराड ,सुजाता शेट्टी आदी मान्यवर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मराठा शहिद स्मारक, कॅम्प येथे पुष्पचक्र वाहून व मेणबत्या प्रज्वलित करून ‘शहिदो को सलाम दिवस’ पाळण्यात आला. शहिद स्मारकासमोर एकत्र येऊन मेणबत्त्या पेटवून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. शहिदांप्रती आपल्या भावना व्यनक्त करताना कार्यक्रमास्थळी राष्ट्रध्वजही लावण्यात आला. शहिद जवानांना वंदन करून भारताच्या सशस्त्र सैन्य दलाला समर्थनार्थ व चीन सैनिकांनी हडपलेली भारतभूमी परत घेण्यासंबंधीची केंद्र सरकारकडे मागणी करणारे फलक यावेळी कार्यकर्त्यांकडे होते.