पुणे :-भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) ला ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’(एन.आय.आर.एफ) सर्वेक्षणात देशात ६३ व्या क्रमांकाच्या महाविद्यालयाचे मानांकन मिळाले आहे.भारती विद्यापीठालाही सर्वेक्षणाच्या विद्यापीठ क्रमवारीत ६३ वे मानांकन मिळाले आहे. भारती विद्यापीठाच्या ३ फ़ार्मसी इन्स्टिट्यूट,१ अभियांत्रिकी महाविद्यालय आणि १ व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय पहिल्या १०० क्रमवारीत आहे .
‘संस्थापक स्व.डॉ.पतंगराव कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, सचिव डॉ.विश्वजीत कदम यांच्या पाठिंब्यामुळे व त्यांच्या प्रोत्साहनामुळे भारती विद्यापीठाने हे यश मिळविले आहे. उच्चशिक्षणाला पोषक वातावरण, उत्तम शिक्षणपद्धती, उत्तम शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळेच आयएमईडी ला व्यवस्थापनाच्या शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान देणे शक्य झाले आहे.’ अशी प्रतिक्रिया डॉ. सचिन वेर्णेकर यांनी व्यक्त व्यक्त केली.भारती अभिमत विद्यापीठा चे कुलपती डॉ . शिवाजीराव कदम ,सचिव डॉ. विश्वजित कदम ,कुलगुरू डॉ .माणिकराव साळुंखे यांनी आय.एम.ई.डी. आणि सर्व इन्स्टिट्यूटचे अभिनंदन केले .