डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते ‘पर्यावरण रक्षक पुरस्कार ‘ चे वितरण
पुण्यातील सतीश खाडे यांच्यासह मान्यवरांचा सन्मान
पुणे :
तरुण भारत संघ(अलवर, राजस्थान )च्या “पर्यावरण रक्षक पुरस्कार २०१९ ” ने १७ राज्यातील जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना गौरवण्यात आले. महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी,पणतु तुषार गांधी यांच्या हस्ते हा सोहळा झाला.
रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या वॉटर कमिटीचे अध्यक्ष सतीश खाडे ( पुणे ) यांना जलसंवर्धन क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
हकिमपुरा( अलवर ,राजस्थान) येथे हे पुरस्कार १५ जानेवारी रोजी देण्यात आले. तरुण भारत संघाचे अध्यक्ष भारताचे जलपुरुष राजेंद्रसिंह असून पुरस्काराचे हे तेरावे वर्ष आहे.
किशोर धारीया,रविंद्र ईंगवले (वाशीम),प्रकाश राव (जलसंधारण मंत्री, तेलंगणा ),भक्तचरण (खासदार व माजी केंद्रीय मंत्री ओरिसा ) ,खासदार एम बी पाटील, (विजापूर कर्नाटक ),बिहार विधानसभा अध्यक्ष श्री सहाय,आमदार किशोर उपाध्याय , शेखर गायकवाड ( साखर आयुक्त,पुणे ) ,श्री डोंगरे (जिल्हाधीकारी नांदेड ),शंभूनाथ (न्यायाधीश,उच्च न्यायालय,उत्तर प्रदेश ),जिल्हाधिकारी पाॅंडेचरी,प्राध्यापक सौ स्नेहल दोंदे,मुंबई ,जयंत बसु (पत्रकार प. बंगाल ) यांनाही गौरविण्यात आले.
कस्तुरबा गांधी ,महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त भारत आणि भारताबाहेर असे सोहळे आयोजित करून जलरक्षकांना गौरविण्यात येणार आहे,असे डॉ राजेंद्रसिंह यांनी यावेळी सांगितले .