ग्रामीण, शहरी एकत्रित प्रयत्नाने ग्रामीण उद्योजकता यशस्वी होणे शक्य
स्टार्स फोरम’च्या दहाव्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेत शनिवारी ‘मेक इन रुरल इंडिया ‘ वर चर्चा
पुणे :’ग्रामीण, शहरी एकत्रित प्रयत्नाने ग्रामीण उद्योजकता यशस्वी होणे शक्य आहे ‘ असा सूर शनीवारी ‘स्टार्स फोरम’च्या दहाव्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेत शनिवारी ‘मेक इन रुरल इंडिया ‘ या विषयावरील चर्चासत्रात उमटला.
ग्रामीण भागातील युवकांना रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त व्यावसायिक कौशल्ये वाढीस लागावीत या उद्देशाने ‘स्टार्स फोरम’ (स्किल्स ट्रेनिंग फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ रुरल सोसायटीज फोरम’) आणि बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन च्या वतीने आयोजित देशातील स्वयंसेवी संस्थांसाठी दहाव्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेत शनिवारी ‘ मेक इन रुरल इंडिया’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
बी. आर .व्यंकटेश (उद्योजकता सल्लागार),डॉ सुधा कोठारी(चैतन्य संस्था), डॉ. दिनेश अवस्थी(सृष्टी संस्था) , अमीर सुलतान(कौशल्य प्रशिक्षण तज्ज्ञ), कुलभूषण बिरनाळे(तंत्रज्ञान सल्लागार),नरेंद्र कराळे(पीपल साईड कन्सल्टिंग संस्था) सहभागी झाले .
योगेश कुलकर्णी (अध्यक्ष, स्टार्स फोरम) डॉ. चैतन्य नाडकर्णी (कार्यकारी संचालक, स्टार्स फोरम) यांनी स्वागत केले.
कुलभूषण बिरणाळे म्हणाले,’ग्रामीण भारतात सामाजिक उद्योजकता वाढविण्यासाठी विस्थापन थांबवून सरकार, कॉर्पोरेट, स्वयंसेवी संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे’
डॉ.सुधा कोठारी म्हणाल्या,’ ग्रामीण भागातील उद्योजकता वाढविण्यासाठी महिलांची भूमिका महत्वाची आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर कसा होतो, हेही पाहिले पाहिजे. स्थानिक आदर्श, यश कथा निर्माण होणे उपयुक्त ठरते. ग्रामीण, शहरी भागांने एकत्र येवून काम केले पाहिजे.’
अमीर सुलतान म्हणाले, ‘बाजारपेठेच्या गरजा भागवायच्या तर उच्च प्रतीची कौशल्ये ग्रामीण उद्योजकतेत निर्माण केली पाहिजेत. त्यासाठी मोठया प्रमाणावर प्रशिक्षण उपलब्ध करावे लागेल. ‘
नरेंद्र कराळे म्हणाले,’ ग्रामीण उद्योजकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करता येणे शक्य आहे. शेतीत,प्रक्रिया उद्योगात अनेक आधुनिक गोष्टी वापरल्या जातात, त्याची दुरुस्ती आणि वापरासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. वाळवलेल्या कांद्याला 400 रुपये किलो भाव आहे, पण शेतकरी तिकडे वळत नाहीत.
व्यंकटेश म्हणाले, ग्रामीण भागातील उद्योजकता प्रशिक्षणाचा दर्जा हा अभ्यासाचा विषय आहे. हे प्रशिक्षण गरजेचे नाही, असेही अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये सहजपणे सांगीतले जाते.’
ही दोन दिवसीय परिषद ‘ बाएफ संस्था ‘ ( वारजे ) येथे पार पडली, यात देशभरातून 150 स्वयंसेवी, सामाजिक संस्था, कंपन्या, शासकीय अधिकारी सहभागी झाले . स्वयंसेवी संस्था एकत्र येवून अशा एकमेकांच्या चांगल्या नाविन्यपूर्ण गोष्टींची आदानप्रदान करू लागल्या तर त्यांचा या गोष्टी शोधण्याचा वेळ आणि श्रम वाचू शकतील. त्यातून विकासाची गती वाढू शकेल. अशा आदान प्रदानासाठी सामुहिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक ७ डिसेंबर रोजी दुसर्या दिवशीच्या सत्रामध्ये ‘मेक इन रुरल इंडिया’, ‘रोल ऑफ सीएसआर’,’ आंत्रप्रुनरशीप इन रुरल इंडिया ‘ आदी विषयांवर चर्चा आयोजित करण्यात आली होती .
या राष्ट्रीय परिषदेत ‘बाएफ’ ने यजमान संस्था म्हणून जबाबदारी पार पाडली.डॉ विवेक सावंत, डॉ राजश्री जोशी, सुभाष देशपांडे, विवेक गिरिधारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.