पुणे: केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेत (सीईटी) पात्र ठरूनही राज्यभरातील २५१ उमेदवारांचे स्वप्न लालफितीत अडकल्याने शासनाने २७ ऑगस्ट पर्यंत निर्णय न घेतल्यास निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा युवक क्रांती दल आणि शिक्षक उमेदवार प्रतिनिधींनी आज पत्रकार परिषदेत दिला.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेला युवक क्रांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे तसेच प्रशांत भोयर,चित्तरंजन धुमे ,दिनेश ठाकूर व इतर शिक्षक उमेदवार उपस्थित होते .या शिक्षकांनी १९ ऑगस्ट रोजी सत्याग्रही आंदोलन पुण्यात शिक्षण संचालक कार्यालयासमोर केले.प्रभारी शिक्षण संचालक (प्राथमिक विभाग) दत्तात्रय जगताप यांनी याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन आंदोलक शिक्षकांना दिले होते. हे आश्वासन पूर्ण झाले नाही तर 2 सप्टेबर पासून पुण्यात निर्णायक आंदोलन केले जाणार आहे .
रखडलेल्या शिक्षक भरतीबाबत अधिक माहिती: शासनाने 2010 मध्ये शिक्षक भरती घेतली त्यात गुणांची पुर्नपडताळणीत 3139 पात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून घेण्यात यावे असे उच्च न्यायालय खंडपीठ ( औरंगाबाद) यांनी निर्णय दिला. त्या नुसार सर्व उमेदवारांना अस्थापनांचे वाटप करण्यात आले. परंतु काही उमेदवार जागा अतिरिक्त किंवा त्या प्रवर्गाच्या जागा रिक्त नसल्या कारणावरून संचालक ऑफिस ला परत आले.असे करता करता शेवट २५१ उमेदवार शिल्लक राहिले,ज्यांना अजून पण पदस्थपना मिळालेली नाही. आणि ते सर्व नौकरीच्या प्रतीक्षेत असतांना सरकारने नवीन भरती राबून 12,000 पदे भरवण्याचे घोषित करून पवित्र पोर्टल शिक्षक भरती मार्फत प्रक्रिया राबण्यात येत आहे. अजून पण जुन्या भरतीतील 2५१ शिक्षक नौकरीच्या प्रतीक्षेत असतांना नवीन भरती राबून 9 वर्षापासून वाट पाहणाऱ्यां उमेदवारांवर अन्याय होत आहे.
२५१ उमेदवारांची रखडलेली जिल्हा परिषद शिक्षक भरती न केल्यास 2 सप्टेबर पासून निर्णायक लढा
युवक क्रांती दल आणि शिक्षक उमेदवारांचा इशारा
या शिक्षक उमेदवारांनी पाठपुरावा चालूच ठेवल्याने शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी ३१ मे रोजी प्राथमिक शिक्षण संचालकांना नियुक्तीचे आदेश दिले .मात्र पुढे काहीही हालचाल झाली नाही.या सर्व शिक्षक उमेदवारांना पात्रता असूनही हलाखीच्या परिस्थितीतून जावे लागत आहे.शासन मात्र कागदी घोडे नाचविणे आणि दफ्तरदिरंगाईकरणे याच्या पुढे जात नसल्याचा या उमेदवारांचा आरोप आहे .