-शहरात टू व्हीलरसाठी फ्री वे करणार
पुणे : महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पालिकेचे 2020-21 या आर्थिक वर्षाचे 6 हजार 229 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडे सादर केले. मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 135 कोटींची वाढ केली आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, उपमहापौर, विरोधीपक्ष नेते यावेळी उपस्थित होते.बीआरटी मार्गांची तज्ञ लोकांकडून अभ्यासपूर्वक माहिती घेवू ,अडचण होते तिथे बीआरटी नको -लोकांना उपयुक्त असेल तिथे अवश्य ठेवू ,आणि दरवेळेस जलसंपदा आणि महापालिका यांच्यात पानी बिलावरून नेहमी वाद होतात यापुढे पाणी विकत कशाला धरणच विकत घेवू शकू काय आपण हे प्रामुख्याने पाहू …असे बेधडक धोरणहे बजेट मांडताना नवे आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केले आहे.
– बीआरटीचा पुनर्विचार करणार.
-शहरात टू व्हीलरसाठी फ्री वे करणार
वेळ आणि जागा वाया जात असल्याने हा अभ्यास करणार. त्यातून दुचाकी सोडता येतील का याचा विचार करण्यात येईल.
शहरातील ३९ लाख वाहनांपैकी २८ लाख दुचाकी वाहने दुचाकी आहेत. या पार्श्वभूमीवर दुचाकींसाठी चारही दिशांना स्वतंत्र ‘फ्री-वे’लेन तयार केल्यास वाहतुकीची समस्या १५ दिवसांत सुटण्यास मदत होईल. दुचाकींसाठी गरज भासल्यास ‘अंडरपास’ तयार करणेही फारसे खर्चिक नसल्याने योजनेचा गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. ‘बीआरटी’ची नेमकी किती आवश्यकता आहे, याचे ऑडिट करण्यासह पुढील ५० वर्षांचा विचार करून मेट्रो मार्ग प्रस्तावित केले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गायकवाड यांनी अर्थसंकल्पात वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी विविध प्रकल्पांसह अनेक उपाययोजना सूचविल्या आहेत. शहरात दुचाकींचे प्रमाण मोठे असून, तिचा विचार केल्यास शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी कमाल ४५ मिनिटे एवढा कालवाधी लागणे अपेक्षित आहे. त्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुचाकींना ‘फ्री-वे’ तयार केला तर, सकारात्मक परिणाम साधू शकतो. हे सर्व यशस्वी झाल्यास अवघ्या १५ दिवसांत पोलिसांच्या मदतीने वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल, असे गायकवाड म्हणाले.
नवी मुंबई ते मुंबई असा फ्री-वे तयार केल्याने अवघ्या बारा मिनिटांत हा प्रवास शक्य झाला आहे. त्याच धर्तीवर दुचाकींचाही ‘फ्री-वे’ असावा असे अपेक्षित आहे. वाहतूक समस्या ही पुण्याची प्रमुख समस्या असून, ती सोडविण्यासाठी शंभर दिवस जरी रस्त्यावर उभे राहायला लागले तरी त्यास आपली तयारी आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही समस्या सोडविण्यासाठी निकराचा प्रयत्न करणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.