पुणे-दक्षिण पुण्याचे ऐतिहासिक सौख्य लाभेले निसर्गाचे लेणे म्हणजे कात्रजचे दोन्ही तलाव अर्था हि धरणे आहेत पण आता त्यांना तलाव म्हटलं जावू लागलय , इथले पाणी पिण्यासाठी वर्षानुवर्षे पूर्वी वापरलय ,पण आत हेच पाणी पिण्यायोग्य नाही म्हणून ,आणि खडकवासला व अन्य धरणांची सोय आहे म्हणून कात्रज च्या या जल संपदेकडे सातत्याने दुर्लक्ष करून इथे पर्यटन केंद्र उभारले गेले. आणि मग या तलावाला गटारे ,नाले , जलपर्णी असे रोग हि जडले गेले . पण गेल्या वर्षी निसर्गाच्या संपदे वर सातत्याने हल्ले करणाऱ्या मानवाला इथे जलकोपाचा सामना करावा लागला . आणि पुराने भल्या भल्या नामांकित बिल्डरांच्या सोसायट्यांना हादरा दिला . तर आंबील ओढ्या च्या बाजूला घरे बांधून राहणाऱ्या गरिबांना हि याचा जोरदार फटका बसला .
या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना सारख्या जागतिक संकटाने हैराण केलेलं असतानाही महापालिका आयुक्त शेखर गायकवाड मात्र वेळेवर जारूक असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी या महामारीच्या काळात हि येणाऱ्या संकटांची चाहूल घेतली आणि कात्रजच्या तलावांकडे आपली पावले वळविली . येथील जलपर्णी, ओढ्याची अवस्था ,बांधकामे हे सारे पाहून आता त्यांनी ओढ्याच्या सफाई बरोबर , दोन्ही तलावात धरणात पावसाळ्यापूर्वीच मोजकेच पाणी ,म्हणजे मासे मारणार नाहीत एवढे पाणी ठेवण्याचे नियोजन केलेय . अर्थात हे दोन्ही तलाव पावसाळ्यापूर्वी रिते करण्याचा यत्न सुरु केलाय . ज्या योगे घाणेरडे पाणी जाईल, जलपर्णी जाईल … आणि नव्या पावसाळ्यात नवे पाणी नवी जलसंपदा ..दरवर्षी इथे जमा होईल ..आणि पक्षी ,निसर्ग संवर्धन होवून आसपासचा परिसर स्वच्छ राहील अर्थात त्यांच्या या प्रयत्नांना किती यश येईल ते येणारा कालच सांगेल पण आता ते काय म्हणतात ते ऐकू या ,पाहू या ….