….’ उल्लू ‘ बनविणारे नेते आवरा अन्यथा बदला ..
पुणे- ज्यांच्यावर पक्षवाढी साठी जनहिताचे निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवून नेतेपद बहाल केले अशीच मंडळी नवीन नगरसेवकांना ‘उल्लू’ बनवून थेट सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी करत संगनमताचे राजकारण करत असून या महापालिकेतील नेत्यांना आवरा अन्यथा आता बदला ..नाही तर २०१९ च्या निवडणुकीत याचे पडसाद उमटतील असा इशारा आता .. नवीन नगरसेवकांकडून आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना दिला जावू लागला आहे . काल सभागृहात २०० कोटी रुपये किमतीची सिंहगड रस्त्यावरील जागा मूळ मालकाला परत देण्याचा ठराव गटनेत्यांनी संगनमताने मंजूर करवून घेतल्यानंतर या मागणीला आता जोर आला आहे . पक्षाचे प्रांतिक आणि शहर अध्यक्ष यांच्याकडे खाजगीत या मागण्या करण्यात येणार आहेत .पक्षाचे भले हवे असेल तर त्यांनी तातडीने याबाबत कठोर पावले उचलणे गरजेचे आहे असे हि म्हणणे मांडले जाते आहे .तीन पक्षातील नवीन नगरसेवकांचे गट हि मागणी आपापल्या वरिष्ठ नेत्यांकडे मांडणार असल्याची चर्चा आहे .
आपल्या अनुभवाद्वारे अभिनयाचे अनेक पैलू सादर करत या नेत्यांनी पालिका सभागृहाचा रंगमंच करून ठेवला आहे . २४ तास पाणी योजना , ३५० कोटीचे सायकल मार्ग ,कोट्यावधीची वर्गीकरणे, बोगस कर्मचारी प्रकरण अशा विविध छोट्या मोठ्या प्रकरणात नेते आपसात संगनमत करूनच महापालिकेचा कारभार हाकत असल्याचे आजवर सर्व नगरसेवकांच्या लक्षात आले आहे . पर्याय म्हणून राष्ट्रवादीकडून दीपक मानकर , विशाल तांबे,अश्विनी कदम,प्रशांत जगताप अशी विविध नावे नेत्या साठी सुचविली जात आहेत . एवढेच नव्हे तर एखाद्या नवीन नगरसेवकाला हि या पदावर संधी दिल्यास प्रामाणिक पणे काम होऊ शकेल असे सांगण्यात येत आहे . तर कॉंग्रेस मध्ये आबा बागुल यांचे नाव पुढे मांडले जाते आहे .गेली २५ वर्षे आबा बागुल नगरसेवक असून त्यांना सभागृहात अवमानित करण्याचे राजकारण करण्यात येते . अशा प्रवृत्तीमुळे कॉंग्रेसचे खच्चीकरण होत आले आहे .भाजपमध्ये हि बदल करणे आवश्यक असून निव्वळ अनुभवी असलेले लोक अनुभवाचा फायदा पक्षाच्या हितासाठी घेतात कि स्वार्था साठी हि बाब तपासून पहावी .धीरज घाटे सारखे युवा नेतृत्व निवडल्यास पक्षाची ध्येय धोरणांची जबाबदारी त्यांच्यावर टाकल्यास त्याचा फायदा २०१९ च्या निवडणुकीत पक्षाला होऊ शकतो . शहर पक्षातील मास्तरांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे एवढेच .असेही सांगितले जाते आहे . किंवा एकबोटे,सरदेशपांडे या सारख्या महिला नगरसेविकांची नावे हि पुढे मंडळी जात आहेत .