संपूर्ण शहर आणि सर्व जाती पाती ,ज्येष्ठ कनिष्ठ यांना सन्मान देणाऱ्या व्यक्तिमत्वाची महापौरपदी निवड करण्याचे नेत्यांना आवाहान ..
पुणे- अनुभवी ,जाणकार म्हणून तेच तेच घिसे पिटे,भेदभाव करणारे चेहरे देवू नका, संपूर्ण शहर आणि सर्व जाती पाती ,ज्येष्ठ कनिष्ठ यांना सन्मान देतील अशा नव्या चेहऱ्याचीच महापौरपदी निवड व्हावी अशी अपेक्षा भाजपमधील नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची आहे. सुमारे १० ते १५ नगरसेवकांचा गट या साठी नेत्यांना एकत्रित भेटून गळ घालण्याची शक्यता येथे दिसून येते आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या कारभार विरोधात म्हणून मिळाले होते. त्यानंतर महापालिका निवडणुकीत हि भरघोस यश मिळाले. त्यानंतर मात्र सर्व जबाबदारी सत्ताधारी म्हणून आपल्यावरच पडली .आणि या मागील अडीच वर्षाच्या महापालिकेच्या कारभारावरच,जबाबदारी वरच या वेळी विधानसभेला पक्षांच्या पारड्यात जे काही पडायचे आहे ते पडले आहे. . महापालिकेचा कारभार हाच विधानसभा निवडणुकीच्या यश आणि अपयशाचा पाया मानला जातो हे लक्षात घेऊन सध्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यश अपयशाचा अभ्यास करून च महापौर पदी पक्षाचे प्रामाणिक पणे काम केलेल्या नव्या नगरसेवकाला महापौर पदाची संधी मिळावी , महत्वाची पदे जुन्या जाणत्या माहितगार अशा गोंडस शब्दांचा वापर करून त्याच त्याच व्यक्तींना देवून पक्षाची पीछेहाट होत आल्याची त्यांची तक्रार आहे. विविध क्षेत्रात टेंभा मिरवून ,उच्च नीच असा भेद करीत ,गटबाजी करून बदनामी ला कारणीभूत झालेल्याना उमेदवारीपासून दूर ठेवले नाही तर पक्षाची जनमानसातील प्रतिमा अशीच ढासळत राहील .ज्येष्ठ,श्रेष्ठ भारदस्त अशा व्यत्कीमत्वा पेक्षा जनमानसात ,सर्वांना बरोबर घेऊन जाणारा महापौर द्यावा, केवळ या भागाला आमदारकी डावलली आणि त्या भागाला द्यायला हवे अशी धारणा ठेवण्या ऐवजी संपूर्ण शहर आणि सर्व जाती पाती ,ज्येष्ठ कनिष्ठ यांना सन्मान देणाऱ्या व्यक्तिमत्वाची महापौर पदी निवड झाली तर ती पक्षाला फायदेशीर ठरेल असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे .