पुणे -आज पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी नेमके काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात
पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या भूमिका पाहता ते आतल्या आवाजाला महत्त्व देत आहेत. पार्थ पवार यांची वाटचाल सत्यमेव जयतेच्या दिशेनं सुरू आहे असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
बीडमधील विवेक रहाडे या युवकानं मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केली. त्यावर उद्विग्न होऊन पार्थ पवार यांनी ट्विट केलं आहे. मराठा नेत्यांनी वेळीच जागं होऊन आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. राज्य सरकारनं हा गुंता सोडवण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी पार्थ पवार यांनी केली आहे.
विवेक यांनी आमच्या मनात पेटवलेली ज्योत व्यवस्थेला पेटवेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
याबद्दल विचारणा केली असता चंद्रकांत पाटील यांनी पार्थ पवार सत्यमेव जयतेच्या मार्गावर आहेत असं मत व्यक्त केलं. पार्थ पवार यांनी यापूर्वीही सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. त्यामुळं ते आतल्या आवाजाला अधिक महत्त्व देतात अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.
राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने आजवर तब्बल शंभरवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्या पत्रांची दखल ठाकरे सरकारने घेतली नाही असा आरोप भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, “करोना प्रकरणी सरकारला दिसत नाही ऐकू येत नाही या सरकारची संवेदनशीलता संपली असल्याची टीका सरकारवर त्यांनी केली.
तसेच ते पुढे म्हणाले की, रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक अनेक मेडिकलमध्ये जातात. मात्र त्या ठिकाणी जादा दर आकारले जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे.त्यावर सरकारचे लक्ष नाही. यामुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने विशेष पथके नेमून काळा बाजार करणार्यावर धाडी घातल्या पाहिजे. मात्र हे होताना दिसत नसल्याची खंत यावेळी त्यांनी बोलवून दाखवली.