पुणे- :पानशेत,वरसगाव,खडकवासला धरण १०० टक्के तर टेमघर ९९.५५ टक्के भरले आहे. एकूण ४ धरणातील साठा ९९. ९४ टक्के झाल्याने ,मुठेत विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे आणि नदीकाठ्च्यांना सावधानतेचा इशारा दिला गेला आहे.
खडकवासला धरण सकाळी दहा वाजता ९७ टक्के झाल्यावर या धरणातून १०वाजता ८५६क्यूसेक, १२ वाजता एक हजार ७१२ क्यूसेक, दुपारी तीन वाजता तीन हजार ४२४ क्यूसेक विसर्ग मुठा नदीत सोडला आहे.धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 3424 क्युसेक विसर्ग वाढवून ठीक 6.00 वा. 5136 क्युसेक करण्यात येत आहे..’पावसाचा जोर वाढल्यास खडकवासला धरणातील विसर्ग वाढू शकतो. नदी काठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी.’ असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी केले आहे. खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, वरसगाव व टेमघर धरणात या तीन ही धरणात सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत पाऊस पडलेला नाही. फक्त पानशेत येथे एक मिलिमीटर पाऊस झाला आहे.पानशेत धरण १०० टक्के भरले आहे. या धरणातून वीज निर्मितीसाठी ६०० क्यूसेक पाणी सोडले आहे. वरसगाव १००टक्के भरले आहे. वरसगाव धरणातून ४४४० क्यूसेक पाणी मोसे नदीत सोडले आहे. टेमघर धरण ९९ टक्के झाले आहे. पानशेत, वरसगाव मधून सोडलेले एकूण पाच हजार ०४० क्यूसेक पाणी खडकवासला धरणात जमा होते. खडकवासला धरणातून नदीत सोडलेल्या पाण्याच्या व्यतिरिक्त कालव्यातून एक हजार १५५ क्यूसेक पाणी शेतीसाठी सोडले आहे.