पुणे- वारंवार सभा न चालविता तहकूब करून सत्ताधारी पळपुटे पणा करून कोरोनाबाबत च्या विविध प्रश्नांपासून पळपुटे धोरण अवलंबित असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला आहे तर ,महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली असताना कोरोनाच्या नावाखाली पुण्याची विकास कामे ठप्प करून कोरोनाच्या नावावर बिले फाडण्याचा डाव सत्ताधारी भाजपकडून खेळला जातोय कि काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे असा आरोप कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केला आहे.
राज्य सरकारने सर्व सभा घेण्याबाबत ३ एप्रिल रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते त्यानंतर ऑनलाईन ,व्हिडीओ कॉन्फरसिंग ने च सर्व सभा आणि बैठका घेण्याचे आदेश ३ जुलैला दिले आहेत . त्याप्रमाणे स्थायी समितीसह अन्य बैठका सभा व्यवस्थित होत आहेत .मात्र जनतेपुढे पारदर्शक असलेली मुख्य सभा मात्र कोरोनाच्या नावाने चालू न देता केवळ मुख्य सभेला शासन आदेशाचे चुकीचे कारण देत या सभा तहकूब केल्या जात आहेत . आणि सत्ताधारी भाजपा मनमानी कारभार करीत आहे .जे काही उपाय योजना करून खर्च केला आहे तो सांगण्यास ,आणि पुढील उपाय योजनांची मुख्य सभेत माहिती देण्यास , शंका ,प्रश्नांची उत्तरे देण्यास काय हरकत आहे. विकास कामे ठप्प करून नेमके भाजपला काय साध्याचे आहे ? असा सवाल या दोन्ही नेत्यांनी केला.