पुणे -भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘आझादी गौरव पदयात्रा’ कार्यक्रमाअंतर्गत ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्व संध्येला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन ते हुतात्मा बाबूगेणू स्तंभ, मंडईपर्यंत ‘क्रांतीज्योत यात्रा’ काढून शहिदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांनी स्वातंत्र्याचा इतिहास विशद केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड,कमल व्यवहारे, दिप्ती चवधरी,रजनी त्रिभुवन,संगीता तिवारी, सुजाता शेट्टी अजित दरेकर, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे, रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, मुख्तार शेख, शेखर कपोते, सचिन आडेकर, विजय खळदकर, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, सतिश पवार, द. स. पोळेकर, प्रकाश पवार, नितीन परतानी, शोएब इनामदार, सुनिल घाडगे, प्रदिप परदेशी, सुजित यादव, प्रशांत सुरसे, निलेश बोराटे, राहुल तायडे, लतेंद्र भिंगारे, सुरेश कांबळे, संदिप मोकाटे, अतुल गोंजारी, हेमंत राजभोज, रवि पाटोळे, रफिक शेख,आयुब पठाण, नारायण पाटोळे, शाबीर खान, गौरव बोराडे, अमर गायकवाड, विनोद रणपिसे, ॲड. अनिल कांकरिया, ॲड. राहुल ढाले, मेहबुब नदाफ, दत्ता पोळ, भिमसेन रोकडे, जयसिंग भोसले, रवि ननावरे आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतीज्योत यात्रेचा मंडई येथील हुतात्मा बाबूगेणू स्तंभास पुष्पहार अर्पण करून समारोपीय भाषणात प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महात्मा गांधीच्या ‘‘अंग्रेज चले जाव’’ या घोषणेमुळे लाखो सत्याग्रही देशाच्या विविध भागात ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात चले जाव चे आंदोलन करायला लागले. त्यावेळेस लाखो देशवासियांच्या मनात एकच ध्येय होते की भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे. १९४२ च्या मुंबईला झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये छोडो भारत आंदोलनाचा ठराव संमत झाला. काँग्रेसने या देशामध्ये अखंडत्व, सार्वभौमत्व ठेवले याचे स्मरण देशवासियांनी करायला पाहिजे. १९४० ला वर्ध्याच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पूर्ण स्वराज्याचा विषय मांडण्यात आला त्यानुसार पं. जवाहरलाल नेहरूंची एकतेची, अखंडतेची परंपरा त्यांच्या मुलीने, नातवाने अखंडपण चालू ठेवली याचे स्मरण करणे गरजेचे आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, सुडाची भावना न ठेवता हा देश अखंड राहिला पाहिजे. आज या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष असून मी त्या लाखो हुतात्म्यांना शतश: प्रणाम करून आदरांजली अर्पण करतो.’’