पुणे-पुरामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के कर्ज माफी दिली पाहिजे अशी मागणी करत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दुष्काळी भागासाठी असलेली राष्ट्रवादी ची शिवस्वराज्य यात्रा आता स्थगित करून पूरग्रस्तांना कशी मदत करता येईल याकडे पाहिले पाहिजे असे येथे सांगितले .
पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात महापूर आला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्य करत आहे. दरम्यान, या परिस्थितीवर बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहर अध्यक्ष चेतन तुपे पाटील, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे तसेच अंकुश काकडे उपस्थित होते.
पवार म्हणाले, सांगली, कोल्हापूर भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा भाग ऊस उत्पादनातील अग्रेसर भाग असून इथल्या पुरामुळे ऊसाच्या एकंदर उंचीपेक्षा अधिक भागापर्यंत पाण्याची पातळी पोहोचली आहे. त्यामुळे ऊस पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर द्राक्षे आणि डाळींब सारख्या फळ बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. जमिनीवरची माहितीही मोठ्या प्रामाणावर वाहून गेली आहे. तसेच घरे, रस्ते इतर पायाभूत सुविधा आणि जनावरेही वाहून गेली आहेत. या जिल्ह्यांमधील अशी परिस्थिती मी आजवर कधीही पाहिली नव्हती. यानंतर आता पाणी ओसरल्यानंतरच नुकसानीचा खरा अंदाज येईल. यावेळी पुराची व्याप्ती आणि पूर भागातील शेतीचे झालेले नुकसान पाहता, पाणी ओसरल्यानंतर शासनाने तातडीने येथील नुकसानीचे मोजमाप आणि पंचनामे करावेत. त्यानंतर नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच केंद्र आणि राज्य सरकारने इथल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, अशी मागणी यावेळी पवार यांनी केली.
राष्ट्रवादीच्या संघटनांकडून पूरग्रस्तांना मदत पुरवणार – पवार
पवारांनी यावेळी राज्य शासनावरही टीका केली. आजवर अनेक संकटे आली तेव्हा शासकीय यंत्रणांनी तत्परतेने कामं केली. मात्र, यंदा मदत आणि पुनर्वसन कार्यात शासकीय यंत्रणा कमी पडल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, तरीही बिकट प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता राज्यातील सार्वजनिक संघटना, तरुणांच्या संघटना आणि सेवाभावी संघटनांनी सर्व हेवेदावे बाजूला ठेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नियोजन केल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. यामध्ये पक्षाच्या विधानसभा, विधानपरिषद आणि संसद सदस्यांच्या एका महिन्याचे वेतन देण्याची घोषणा त्यांनी केली. या वेतनाचा ५० लाखांचा धनादेश सोमवारपर्यंत संबंधीत यंत्रणेपर्यंत पोहोचवला जाईल असेही त्यांनी सांगितले. याशिवाय राष्ट्रवादीची आरोग्य विषयक काम करणारी संघटना तसेच डॉक्टर सेलकडून विविध प्रकारच्या तातडीच्या औषधांची आणि डॉक्टरांची पूर्तता करण्यात येणार असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. कोल्हापूर-सांगलीत तर महापूर आला आहे. या महापुरामुळे हजारो नागरिकांना स्थलांतरीत होण्याची वेळ आलीये. नेव्ही, लष्कर आणि एनडीआरएफच्या टीम युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवले. ते म्हणाले की, शासकिय यंत्रणा सपशेल फेल ठरली आहे. यावेळी त्यांनी यापूर्वीच्या नैसर्गिक आपत्तीवेळी राब्लेलेया यंत्रणांची आठवण करून दिली .
ही परिस्थिती का उद्भवली आणि शासन तोकडे का पडले, याच्या खोलात जावे लागेल. कर्नाटक आणि महाराष्ट्रात जुना वाद आहे. परंतु कर्नाटक सरकारने वाद न करता मानवता म्हणून मदतीची भूमिका घ्यावी. राज्य सरकार जरी कमी पडत असले तरी केंद्राने राज्याच्या पाठीशी उभे राहावे. केंद्र सरकारच्या सर्व संघटना येथे पाठवण्याची गरज आहे. राजकीय टीकाटिप्पणी न करता लोकांना मदत कशी करता येईल, ही आमची भूमिका आहे, असेही पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षाकडून वैद्यकीय मदत
राष्ट्रवादीचा डॉक्टर सेल अतिशय प्रभावी आहे. यात डॉक्टरांना संघटित करण्याचे काम केले आहे. याबाबत जशी गरज पडेल तसे हे डॉक्टर जाऊन वैद्यकीय सेवा देणार आहेत. वैद्यकीय सेवा आणि त्या अनुषंगाने औषधी देण्याची सेवा राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात येत आहे. अशाच प्रकारे इतरांनी पुढाकार घेऊन मदतकार्यात यावं, असंही पवार म्हणाले.
राष्ट्रवादीतर्फे 50 लाखांचा मदत निधी
पूरग्रस्त भागात मदतीचे आवाहन करताना पवार म्हणाले की, आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सार्वजनिक संस्था, सेवाभावी संस्था, तरुणांच्या संघटनांनी या सर्वांनी पुढाकार घेऊन मदतकार्याला हातभार लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. पाणी ओसरताच विदारक परिस्थिती खऱ्या अर्थाने समोर येईल. राष्ट्रवादीचे जेवढेही लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्वांनी आपले एक महिन्याचे मानधन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा जवळपास 50 लाखांचा निधी आम्ही देणार आहोत.
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
>पाणी पातळी वाढल्यामुळे उसाचे नुकसान
>पावसामुळे दाळिंब आणि द्राक्षाचे ही नुकसान
>लहान व्यावसायिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्याव आर्थिक संकट कोसळले
>दुधाची आवक 35 ते 40 टक्के कमी झाली
>पुरामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचे, शेतीचे, घरांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान
>केंद्र आणि राज्य सरकारने पुर सदृष्य भागात 100 टक्के कर्जमाफी करावी
>राष्ट्रवादी पक्षाकडून वैद्यकीय मदत
>राष्ट्रवादीकडून 50 लाखांची मदत