पुणे-मुंबई ते पुणे अशा हायपूरलूप मार्गाची घोषणा म्हणजे एक बनवाबनवीच असून जगात हायपरलूप कुठेही यशस्वी झालेली नाही .निव्वळ शेतकऱ्यांच्या जमिनी यासाठी घेतल्या जाण्याची शक्यता आहे असा आरोप आज मंचर येथे राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी केला .राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा आज मंचरमध्ये दाखल झाली प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील, , छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, विलास लांडे, दिलीप मोहिते, पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, राम कांडगे, रमेश थोरात, अतुल बेनके, प्रदीप गारटकर, जालिंदर कामठे, देवदत्त निकम, विवेक वळसे पाटील, रोहित पवार, आंबेगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, आंबेगाव – शिरुर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, अरुणा थोरात, तुळसी भोर, रुपाली जगदाळे, पांडुरंग पवार, शरद लेंडे, प्रकाश पवार, स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, सुनिता गावडे, आंबेगावच्या सभापती उषा कानडे, शिरुरचे सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा बँकेच्या संचालिका डॉ.वर्षा शिवले, संचालक संजय काळे, जिल्हा दूध संघाचे संचालक केशरताई पवार, संचालक दौलत लोखंडे, सुभाष उमाप, प्रकाश घोलप, सचिन भोर, अमोल जगताप, बाळासाहेब बेंडे, अॅड.प्रदीप वळसे पाटील, शैलेश मोहिते, अनिल राक्षे, पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे, संजोग वाघरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
बैलगाडा शर्यत चालू करणार असे आश्वासन इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिले होते. मात्र अजूनही बैलगाडा शर्यत चालू झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्तेत बसवा आम्ही बैलगाडा शर्यतीबाबत योग्य निर्णय घेऊ, कायद्यात काय तरतूद करायची आहे ते आम्ही बघू तुम्ही फक्त आम्हाला ताकद द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अजित पवार यांनी मंचर येथील परिवर्तन यात्रेत केले. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांसाठी आ. दिलीप वळसे पाटील यांनी खासगी कारखाना काढाला. गेली पाच वर्षे सांगितले जात आहे इथे रेल्वे येणार, विमान येणार पण कधी येणार हे सांगत नाही यामुळे तुम्हा लोकांचेच नुकसान होत आहे. तुम्ही वेगळे लोक निवडून देता म्हणून हे नुकसान होत आहे. इथे साधे रस्ते नीट नाही आम्ही सरकारमध्ये आलो तर इथले रस्ते नीट करू. नाही केले तर अजित पवारला पुन्हा इथे येऊ देऊ नका असे आव्हान पवार यांनी केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण केले आहे त्यांच्या पत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा पत्र पाठवले आहे.. उपोषणासाठी शुभेच्छा पत्र ..? असा सवाल देखील आ. अजित पवार यांनी विचारला तर राज्यात पुण्यासह सर्वत्र कायदा सुव्यवस्था ढासळली असून पुण्याची यांनी वाट लावली आहे असाही आरोप यावेळी केला .