पुणे-देशाचे संविधानामुळे देशाची एकता आणि अखंडता मजबूत आहे. भारत राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे आणि हे टिकून ठेवण्यासाठी आपण सर्वजण कटिबध्द राहिले पाहिजे.’’ असे मत ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी येथे व्यक्त केले .
भारताचे माजी पंतधान, भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिधी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रा. उल्हास बापट यांचे ‘‘राष्ट्रीय एकात्मता व सविंधान’’ या विषयावर काँग्रेस भवन येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शहराध्यक्ष रमेश बागवे व ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, अनिल सोंडकर, रमेश अय्यर, पुजा आनंद, रजनी त्रिभुवन, वाल्मिक जगताप, भगवान धुमाळ, ॲन्थोनी जेकब, प्रविण करपे, सुरेश कांबळे, ज्योती परदेशी, ॲड. अनुप बेगी, चेतन आगरवाल, भगवान धुमाळ, नितीन परतानी, देवीदास लोणकर, रेखा गहलोत आदी उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतान प्रा. उल्हास बापट म्हणाले की, आपल्या देशाच्या लोकशाहीला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान १९५० साली अमंलात आले. भारतात संसदिय लोकशाही आहे. केंद्रिय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या शिफारसीने राष्ट्रपती करतात तसेच राज्यपालांची नियुक्ती सुध्दा पंतप्रधानांच्या शिफारसीने राष्ट्रपती करतात. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींची शिफारस सरकार करते आणि त्या अनुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने घटना तयार करताना देशातील सर्व जाती जमाती व देशाचा विचार केला. कालानुसार घटनेमध्ये काही तरतुदी करण्यात आल्या. भारतीय संविधान मजबूत असल्यामुळे गेली ७५ वर्षे भारतात लोकशाही टिकून आहे. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू हे १७ वर्षे भारताचे पंतप्रधान होते. देशाच्या हिताकरीता निर्णय घेताना विरोधी पक्षांना विश्वासात घेत असे पण आजचे राजकर्ते नागपूर विद्यापीठाच्या संमती किंवा आदेशाशिवाय नेमणुक करीत नाही. जगात काही देश वगळता इतर देशात जेथे लोकशाही होती तेथे काही काळानंतर हुकूमशाही आली. परंतु भारतातील राज्यकर्ते आणि जनतेचा लोकशाहीवर असलेल्या विश्वासामुळे देशात लोकशाही टिकून आहे.
इंदिरा गांधींच्या दुर्दैवी निधनानतंर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्या दूरदृष्टीकोनामुळे देशात संगणकाची क्रांती झाली. दळणवळण क्षेत्रात सुध्दा त्यांच्या कारकिर्दीमध्ये देशाची प्रगती झाली. निवडून आलेले लोकप्रतीनिधी पक्षाचा आदेश धुडकावून पैसे घेवून विरोधी मतदान करण्याचा प्रकार वाढत होता आणि काही लोकप्रतिनीधी एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यावर लोकांचा विश्वासघात करून आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात प्रेवश करीत होते. याच्यावर आळा घालण्यासाठी राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा आणला.