पोळे ते घिसर रस्ता झाल्यास अति दुर्गम भागाचा विकास होईल -अमोल नलावडे
वेल्हे- तालुक्यातील पानशेत धरण क्षेत्रामध्ये असणाऱ्या पोळे या गावापासून ते डोंगर फोडून घिसर गावापर्यंत रस्ता केल्यास पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्याचा विकास होईल तसेच या भागातील लोकांना पानशेत आणि वेल्हे या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी सोपे होईल हा भाग अतिदुर्गम असल्याने लोकांना बाजारासाठी आरोग्यासाठी आणि इतर सर्व कामांसाठी वेल्हे किंवा पानशेत या ठिकाणी यावे लागते ते जाणे आता या रस्त्यामुळे सोपे होणार आहे त्यासाठी डोंगरातून चालत वीस ते तीस किलोमीटर पर्यंत जावे लागते हा रस्ता झाल्यांने पोळे ते घिसर जाणे सोपे होईल असे मत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अमोल नलावडे यांनी व्यक्त केले त्यांच्यासमवेत वेल्हे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब राऊत हे होते
नलावडे यांनी पोळेगाव ते कंधार वस्ती या पाच किलोमीटर डांबरी रस्त्याचे उद्घाटन केले तसेच पायी चालून विविध कामांची पाहणी केली आणि वाड्या-वस्त्या वरील वृद्ध महिला विद्यार्थी यांची भेट घेऊन अडीअडचणी समजावून घेतल्या त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजनांची ची माहिती देऊन त्या योजना या गरीब लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले ही सर्व कामे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे असे ते म्हणाले
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता अरुण शेलार उद्योजक आनंता निवंगुणे माणगाव चे सरपंच दत्तात्रय निवंगुणे सचिन निवंगुणे अजिंक्य पोळेकर सोमजाई प्रतिष्ठान चे रघुनाथ ढेबे बाळासाहेब ढेबे लक्ष्मण ढेबे शिवाजी ढेबे पोळेळेगाव चे उपसरपंच शंकर ढेबे संजय हिरवे माजी उपसरपंच अप्पासाहेब ढेबे पप्पू ढेबे रामभाऊ ढेबे संतोष ढेबे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते