आयत्या वेळेचा आयता गोंधळ आणि सभांची ‘छुपे रुस्तुमगिरी’
सभा कुठली असू द्यात विशाल अशा छत्रपती सभागृहात घ्या –
–प्रसार माध्यामंना प्रत्यक्षात गैलरीतून वार्तांकन करू द्यात
पुणे- नगरसेवक सोडा , मी विरोधी पक्षनेता असूनही विषयांची माहिती वेळेवर दिली जात नाही, उद्या स्थायी समिती आणि आज कार्यपत्रिका पाठविली जाते, शिवाय आयत्या वेळी अचानक ५ /५० विषय दाखल करून घेताना ते निट पूर्ण वाचूनही न दाखवता , माहिती न देता दाखल करून घेतले जातात , मंजुरीचे हि तसेच हे सर्व आयत्या वेळेचे आयते गोंधळ करवून मंजूर करवून घेतले जातात . या सर्वांना सत्ताधारी जसे जबाबदार आहेत तसेच नगरसचिव आणि उपनगरसचिव यांनी कायदेशीर , नियमाला धरून काम करणे त्यांचे कर्तव्य असताना ते निव्वळ सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करत त्यांच्या हातचं बाहुलं बनून राहिल्याने होत असल्याचा घणाघात अखेर विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केला आहे.
कार्यपत्रिका प्रत्यक्षात किमान ४ दिवस अगोदर मिळायला हवी , त्यानंतर त्यातील विषयांचे डॉकेट पाहून त्यावरची माहिती घ्यावी लागते आणि नंतर पक्षीय पातळीवर आम्हाला निर्णय घेऊन आमच्या नगरसेवकांना कळवावे लागते अगर त्यांच्याशी विचारविनिमय करावा लागतो. पण मंगळवारच्या बैठकीची कार्य्पात्रीकच सोमवारी संध्याकाळी देणे , आयत्यावेळी ५/ ५० विषय दाखल करवून घेणे , ते घेताना विषयाचे पूर्ण वाचन न करता दोन शब्द वाचून , कार्यपत्रिका घरी पाठविली आहे असे सांगून काही गोंधळ निर्माण करून विषय मंजूर करवून घेणे , मतदान घेताना हि चुकीच्या पद्धती अवलंबणे , विशेष म्हणजे हे सर्व कळू नये म्हणून ,पारदर्शकता राहू नये म्हणून मुख्य छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभा घेणे शक्य असतानाही ती त्रोटक जागेत गर्दी होईल अशा ठिकाणी घेणे आणि तिथे प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकरणे यामुळे स्थायी समिती असले , मुख्य सभा असेल अशा सभांचा कारभार मनमानी आणि चुकीचा होत असल्याचा आरोप करत धुमाळ यांनी ,’यास महापौरांचे अधिकार’ असे सांगून नगरसचिव कायदेशीर जबाबदारी झटकून सत्ताधाऱ्यांना थेट सहाय्य करत असल्याचा आरोप केला आहे.
महापालिकेची मुख्य सभा अगर स्थायी समितीची सभा ऑनलाईन असू द्यात ऑफ लाईन असू द्यात पण ती विशाल अशा मुख्य छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घ्यावी आणि प्रसार माध्यमांना तिचे थेट वार्तांकन करू द्यावे म्हणजे ,कोण कसे वागले याचे थेट पारदर्शक चित्र दिसेल . पण असे न करता छोट्या जागेत सभा घेतली जाते आणि तिथे गर्दी होते म्हणून अनेक मान्यवरांसह माध्यमांना प्रवेश नाकारला जातो, आणि नंतर परिषदा घेऊन सभेत काय झाले त्याची आम्ही माहिती सांगतो असे सांगून त्याप्रमाणे मग वृत्ते प्रसारित होतात , या मागे भाजपाला पारदर्शक कारभार नकोच असल्याचे स्पष्ट दिसते आहे .
दिपाली प्रदीप धुमाळ
विरोधी पक्षनेत्या