3 दिवस झोपा काढल्या नंतर यांना कळले सभागृहात माझे शब्द चुकले म्हणून..
पुणे- छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मी नागपूरच्या अधिवेशनात बोललो तेव्हा भाजपचे सारे नेते सभागृहात होते तेव्हा कोणी काही बोलले नाही,३ दिवस झोपा काढल्या नंतर समजले माझे शब्द चुकले..असले राजकारण करता..? मी काही चुकलो नाही.आता बघा १ वर्षे उलटली तरी महापालिकेच्या निवडणुका घेईनात,आमच्या काळात आम्ही आरक्षण,वगैरे सर्व गोष्टी पाहिल्या नंतर हे जून मध्ये आलेत,पावसाळा हे कारण दिले गेले आता तो हि गेला, आता जानेवारी आला,आता तरी घ्या ना निवडणुका ?यांना निवडणुका घ्यायच्या नाहीत सारेच आपल्या हातात ठेवायचे असा स्पष्ट आरोप काल येथे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.धाडसी,निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी फक्त राष्ट्रवादीतच असल्याचा दावा त्यांनी करत येथे दक्षिण पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.
पहा आणि ऐका अजित पवार यांचे संपूर्ण भाषण …
(बोलण्याच्या ओघात अनावधानेचूक:तरीही तातडीने दिलगिरी-बोलण्याच्या ओघात अनावधाने यावेळी अजित पवारांनी भाषणात ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ ऐवजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर’ असा उल्लेख केला.हे लक्षात येताच भाषणानंतर चुकीच्या उल्लेखाबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त करत आपली चूक कबूल केली आहे.)