पुणे- येऊ घातलेल्या मेट्रो च्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या महात्मा फुले मंडइतील गाळे धारकांच्या भाड्याच्या रकमेत ३३ पट वाढ आणि दर ११ महिन्यांनी नवा करार असा निर्णय महापालिकेने घेतल्याने मनसे च्या रवी सहाने यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येथील १२०० मराठीव्यावसायिकांच्या मुळावर महापालिका उठल्याचा घणाघात त्यांनी केला आहे .
ते म्हणाले,’ सर्वदुर परिचित असलेली पुणे शहरातील महात्मा फुले मंडई मधे 134 वर्षा पासून मराठी व्यायसायिक अनेक पिढ़या आपला व्यवसाय करत आली असून यामधे कांदे बटाटे , भाजीपाला , नारळ , सर्व प्रकारचे फळे इत्यादि साहित्य विक्री करत आपला उदर निर्वाह करत आली आहे.
134 वर्षा पूर्वी इंग्रजांनी बांधलेल्या या मंडई चे नाव रे मार्केट होते , स्वातंत्र नंतर याचे महात्मा फुले मंडई असे नामकरण करण्यात आले.पुणे शहराच्या मध्य भागी असलेली मंडई सर्वांच्या गरजेची होतीच आणि जिव्हाळाची ही होती.
येथील 1200 मराठी व्यावसायिकांनी मोठ्या मेहनती ने आज ही तीच ओळख आणि जिव्हाळा कायम ठेवला आहे.परंतु येथे होणाऱ्या मेट्रो स्टेशन मुळे पुढे होणाऱ्या बदला साठी येथील मराठी व्यावसायिकांना लूटण्याचे पुणे मनपा ने ठरविल्याचे दिसत आहे.येथील 1200 गाळा धारकांना येणाऱ्या भाडया मधे अन्यायकारक 33 ते 40 पट भाडेवाढ करण्याचे सूचित केले आहे.33 ते 40 पट भाडेवाढ आणि त्यात ही अकरा महिन्याचा करार हे म्हणजे परत 11 महिन्या नंतर पुन्हा भाड़ेवाढ हे अत्यंत संताप जनक असून मराठी व्यापाऱ्यांना बाहेर चा रस्ता दाखविण्यचा आणि धनिकांना आमंत्रण देण्याचा मनपा चा दुष्ट हेतु दिसत आहे.आमचा ही येथे नारळ पाकळी मधे तीन पिढी पासून नारळाचा गाळा आहे , आम्हांला ही नोटिस देण्यात आली आहे यात लिहले आहे पुढील आठ दिवसात आपण नवा करार करण्यास या.या नवीन करारात 33 पट भाडेवाढ सुचवली आहे याविरुद्ध या सर्व गाळाधारकांमधे संतापाची भावना आहे , या अन्याय कारक भाड़ेवाढी विरोधात आंदोलन आणि कायदेशीर मार्गाने लढा उभा केला जाणार आहे.मराठी व्यावसायिकांवर होणारा हा अन्याय मनसे कदापि सहन करणार नाही.ज्यांनी ही अन्यायकारक भाड़ेवाढ सुचवली आहे त्यांनी ताबडतोब मागे घ्यावी.असेही रवी सहाणे यांनी म्हटले आहे.