पुणे- बी आर टी कुठल्याही परिस्थितीत बंद होता कामा नये असे स्पष्ट मत व्यक्त करीत बीआरटी सक्षम करण्याकरिता उपाय योजनांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे वेळ मागितला आहे.
या संदर्भात त्यांनी आयुक्तांना दिलेलेया पत्रात म्हटले आहे कि ,नुकतेच पुण्याच्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाच्या प्रसंगी आपण केलेल्या बीआरटीबाबतचे मत वाचनात
आले. प्रत्येक शहराला सक्षम सार्वजनिक वाहतूक असावी असे संकेत अनाताराष्ट्रीय, देश व राज्य पातळीवर
सातत्याने मांडले जात आहेत व त्या पद्धतीने आराखडे बनवले जात आहेत. पुण्यामध्ये सर्वकष वाहतूक
आराखडा तसेच देशपातळीवर राष्टीय वाहतूक आराखडा बनवला गेला आहे.
यापूर्वी JNNURM अंतर्गत पुणे शहराला करोडो रुपये बीआरटीसाठी मिळाले व त्याचबरोबर महानगरपालिकेने
देखील यासाठी बराच मोठा खर्चाचा वाटा उचलला. अनेक अडचणीतून ही योजना गेली परंतु आज ती ह्या
सर्व अडचणीवर मात करून बऱ्याच अंशी सक्षम झाली असून यातून लाखो नागरिक रोज प्रवास करीत आहेत.
या बसेस मधून प्रवास करणारे नागरिक या योजेनेवर समाधान व्यक्त करतात. अजूनही बीआरटी योजनेत
अनेक ॠटी आढळतात परंतु ह्या सर्व प्रशासकीय पुढाकाराने दुरुस्त होऊ शकतात.
प्रत्येक शहरात खाजगी गाड्यांमुळे होणारे वाढते प्रदूषण, त्यामुळे आरोग्यावर होणारी हानी लक्षात घेता
खाजगी वाहतूक कमी करून सक्षम सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे हेच आजचे धोरण आहे.
तरी बी आर टी योजना कुठल्याही परिस्थितीत बंद होता कामा नये किंबहुना बी आर टी ची योजना अधिक
सक्षम कशी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्याच्या उणीवांचा अभ्यास करून ही सेवा सुधारल्यास
खाजगी वाहनांचा वापर नक्कीच कमी होऊ शकतो आणि तीच काळाची गरज आहे.
तरी या मुद्यावर चर्चा करण्यासाठी आपली वेळ मिळावी. ही विंनती.