पुणे-छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. रयतेचे ऐकूनच ते निर्णय करीत ,पण पुण्यात जनतेचे म्हणणे धुड्कारून सक्ती चा कारभार राबविला जातो आहे ,पुण्यात मुघलांचे राज्य असल्याचा त्यामुळे भास होतो आणि हे राज्य उलथवून टाकण्याची संधी जनतेला आता निवडणुकीतच मिळेल असे येथे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी म्हटले आहे . पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे हेल्मेट सक्तीविरोधात आंदोलन करण्यात आले .यावेळी माध्यमांशी बोलताना सुरतवाला म्हणाले ,वाहतुकीचा खोळंबा हि पुण्याची मुख्य अडचन आहे पण त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून वसुलीवर लक्ष केंद्रित केले जाते आहे .पुण्यात आगामी निवडणूक राम मंदिरावर होणार नाही तर ती हेल्मेटवर होईल ,आणि ज्यांना ज्यांना हेल्मेटचा जाचझाला तेते भाजपला धडा शिकवतील.