पुणे-काय मित्रा,कसा आहेस ? हे खासदार बापट यांचेच नाहीतर नगरसेवक बापट,आमदार बापट यांचेही वाक्य प्रत्येकाला ठाऊक असलेले वाक्य नावानिशी ते प्रत्येकाला ओळखत आणि हि वाक्य बोलता बोलता खांद्यावर हाथ ठेऊन विचारपूस करत बापट यांची हि खासियत होती. त्यांचे आडनाव बापट असले,कसबा जरी ब्राम्हण समाजाचा बालेकिल्ला मानला जात असला तरी बापटांनी कधीच जातीभेद केला नाही हे खुद्द कट्टर ब्राम्ह्ण्यावादी कार्यकर्त्यांना कधीच समजले नाही.बापटांच्या सुरुवातीच्या काळात पक्षातील त्यांचे सहकारी शिवाजीराव आढाव, योगेश गोगावले,विजय काळे होते हे सारे महापालिकेच्या सभागृहात वाघ होते,पण बापट सभागृहाबाहेर ते नागरिकांत मात्र ते प्रेमळ मित्रच जणू भासत.बहुधा बापट महापालिकेबाहेर नेहमी राम कांबळे आणि त्यांचे एक पत्रकार मित्र यांच्यासमवेत नेहमी दिसत.राम कांबळे नंतर पत्रकार मित्राच्या सल्ल्याने कॉंग्रेस मध्ये गाडगीळांच्या समवेत गेले,पण बापटांच्या स्वभावात बदल झाला नाही.पक्ष जात विरहित असे राजकारणापलीकडे जाऊन त्यांनी आपले संबध जोपासले.हीच बापटांची खासियत होती.त्यांनी कधी इतर लॉबी,राजकारण करणारांचे ऐकले नाही इतरांना वाटत आता बापट यांच्या कानावर घातलेय, पण बापट मात्र त्यातूनही स्वतःच्या मनाला बरोबर वाटत तेच करत आणि यामुळे त्यांच्यापाशी राजकीय खेळी करणारे जरी अव्याहतपणे वावरले तरीअशा लोकांच्या खेळी कधीही यशस्वी झाल्या नाहीत.
गिरीश बापट हे पुण्याच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखले जात. राज्यात सत्ता कोणाची ही असली तरी आपले काम साधून घेण्याची कला गिरीश बापट यांना उत्तम अवगत होती.तगडा लोकसंपर्क ही गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जात. सगळ्या पक्षातील नेत्यांसोबत प्रेमाने, मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे गिरीश बापट यांना राजकारणात अडचण आली नाही.गिरीश बापट यांचा पारंपरिक मतदारसंघ कसबा होता. तेथून ते सलग पाच वेळा आमदार राहिले. त्यामुळे मतदारसंघावर मजबूत पकड आहे. त्यांच्या शब्दा बाहेर जाणार नाहीत अशी कार्यकर्ते त्यांनी तयार केली आहे.त्यामुळे आता लागलेल्या निवडणुकीत भाजप बापटांना सोडून प्रचार करू शकत नाहीत. कसब्यातच नव्हे तर पुण्यात बापट यांच्या शब्दाला मानणारा कार्यकर्ता आणि नागरिक आहेत हे कोणालाही न जमणारे बापटांना मात्र सहज सुलभतेने जमले होते त्यास त्यांचा स्वभाव कारणीभूत होता . एखाद्या समाजाने त्यांना एखाद्या त्यांच्या परीचीतास किंवा मित्रास झिडकारण्याचा प्रयत्न केला तर बापट मात्र त्यात पडत नाही असे दाखवीत आणि झिडकारल्या जाणाऱ्या त्या व्यक्तीस आपले बळ कधी प्रदान करत ते भल्याभल्यांच्या लक्षात यायला उशीर होत . पण बापटांना चालेंज करण्याचे साहस मात्र कधी कोणी केल्याचे दिसले नाही.
कधीही कोणालाही जाहिरात न देणारा, कुठेही फ्लेक्स न लावणारा,कधी तगड्या पार्ट्या न देणारा, कधीही मोफत सहली न काढणारा पण तरीही सर्वत्र मित्रत्व अबधित ठेवणारा हा नेता पुन्हा होणे नाही हेच खरे .पुण्याचे आता खरे नेतृत्व हरपले आहे हे जाणकारांनी लक्षात घ्यायला हवे .