कसब्यात एकही उमेदवार पसंत नाही NOTA चे बटन दाबण्याकडे कल वाढतो आहे. का वाढतो आहे ते घ्या जाणून
40 वर्षात प्रथमच केला होता गिरीश बापट यांनी कालवा समितीच्या बैठकीतून सभात्याग .
भाजपाला मतदान केले पण आता NOTA चे बटन दाबणार ,काहीजणांचा निर्धार
पुणे – बापटांच्या उजव्या डाव्या बाजूला बसून आता बापटांच्या आजारपणाचा फायदा लाटून सह्नुभूतीने मते मिळवू पाहणारे महापालिकेचे तब्बल ५ वर्षे पदाधिकारी म्हणून वावरलेले दोन महारथी तेव्हा कुठे होत्या .. जेव्हा खासदार असून हि बापट यांना कसब्यातील पाणी प्रश्नासाठी विभागीय आयुक्तांच्या बैठकीतून निषेध व्यक्त करत बाहेर पडावे लागले ,आयुक्तांच्या बंगल्यावर धडक देऊन आयुक्तांच्या बंगल्यातील पाण्याचे प्रेशर तपासावे लागले .. तेव्हा आज कसब्याची आमदारकी लढविणारे महापालिकेचे पदाधिकारी हेमंत रासने होते तरी कुठे असा सवाल कसब्यातील नागरिक करू लागले आहे. पाच हि वर्षे तुडुंब पाऊस , धरणे हाऊस फुल असताना पंचतारांकित हॉटेल्स आणि काही ठिकाणी पाणी मुबलक दिले जात असताना कसब्याच्या पाणी प्रश्नासाठी स्थायी समिती अध्यक्ष , महापौर का लढले नाहीत ? तेव्हा खासदारांनाच जावे लागेल , आणि ते दिल्लीला गेले कि तेव्हाच किंवा अधिवेशनाच्याच वेळेत कसब्यात का पाणीपुरवठा कमी दाबाने कमी वेळ होत होता ? अशा प्रश्नांची उत्तरे द्याल काय असे विचारले जाऊ लागले आहे. भाजपच्या उमेदवाराला रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या खासदार बापट यांचा प्रचारासाठी सहारा घ्यावा लागला , त्यांच्या आजारपणाचे भांडवल करून सहानुभूती मिळवू पाहणारे त्यांचे उमेदवार कसब्यात पाण्याची समस्या सोडवू शकलेले नाहीत चार वेळा स्थायी समिती अध्यक्ष असूनही तेथील पाण्याच्या समस्येसाठी खुद्द खासदारांना आयुक्तांच्या बंगल्यावर धाड मारून त्यांना जाब विचारावा लागला तेव्हा ते म्हणाले, आयुक्तांवर प्रेशर आहे .. कुणाचे प्रेशर होते तर महापालीकेतल्याच पदाधिकाऱ्यांचे … ?तेव्हा याच नेत्यांवर कुरघोडी म्हणून कसब्याचे पाणी ज्यांनी पळविले आता त्याच नेत्यांच्या आजारपणाचा फायदा लाटून कोणी कोणी आमदार होऊ पाहत आहेत काय ? असा सवाल देखील केला जातो आहे . जेव्हा बापट कसब्याच्या पाणी प्रश्नावरून आयुक्त विक्रमकुमार यांच्या बंगल्यावर गेले तेव्हाअवघे २/३ नगरसेवक त्यांच्याबरोबर होते आहे . महत्वाचे हे दोन पदाधिकारी त्यांच्या समवेत का नव्हते ? त्यांना कसब्यातल्या नागरिकांना पाणी व्यवस्थित पुरवावे असे का वाटले नाही ? कि बापटांवर च कुरघोडी चे राजकारण ते करत होते ? असे सवाल करत आता कसब्यात एकही उमेदवार पसंत नाही NOTA चे बटन दाबण्याकडे कल वाढतो आहे.