–
पुणे- एखादा नगरसेवक एकदा महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष झाल्यावर आपल्या मतदार संघाचा कायापालट करतात. मात्र, भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होऊनही मतदार संघात काहीच कामे केली नाहीत. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात काय काम केली, हे मतदारांसमोर मांडावे, असे आव्हान राज्यसभेच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी केले.
कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अॅड. वंदना चव्हाण बोलत होत्या. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते.
अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, महाविकास आघाडेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी नगरसेवक म्हणून चांगले काम केले आहे. ते तत्परतेने काम करणारे व सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी म्हणून परिचीत आहेत. या उलट भाजचा उमेदवार आहे. त्यांचे उमेदवाराने चार वर्ष महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये काम केले आहे, त्यातील तीन वर्ष ते स्थायीचे सदस्य होते. या कालावधीत त्यांनी मतदार संघासाठी काहीच काम केले नाही. एक वर्ष अध्यक्षपद मिळाल्यावर अनेकजण कामाची चुणूक दाखवतात, मात्र रासनेंना चार वर्षात काही करता आले नाही. त्यांनी काय काम केले, असा प्रश्न नागरुकांना पडला आहे.
दुसरीकडे सत्तेवर आल्यावर भाजपने स्मार्ट सिटीची फसवी योजना आणली. या योजनेसाठी आमच्या नगरसेवकाने कामे केलेला बाणेरचा परिसर निवडला. स्मार्ट सिटीसाठी स्वारगेट किंवा स्टेशनचा परिसर निवडला असता तर स्मार्ट सिटीने काय काम केले, हे लोकांसमोर आले असते. मात्र आमच्या कामावर चमकोगिरी केली. तशाच प्रकारे नागरिकांना फसविणारी स्वच्छ भारत योजनाही भाजपने आणली. योजनेसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात, मात्र सर्वत्र कचरा तसाच दिसतो.
यासर्व गोष्टींवर महापालिकेतील सत्ताधारी म्हणून महापौर व स्थायी समितीच्या अध्यक्षांनी प्रशासनावर वचक ठेवायला हवा. मात्र तसे झाले नाही. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काळात जेएनएनयु मधून शहरातील अनेक कामे झाली.
महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहरातील आरक्षित जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही तो प्रयत्न हाणून पाडला. भाजपच्या सत्ताकाळात महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या शाळांची, ऐतिहासिक वास्तू व ठिकाणांचीही दुरावस्था झाली आहे. सार्वजनिक वाहतुकीचाही बोजवारा उडाला आहे. भाजपने मिळकतकराची ४० टक्के सूट काढून घेतली.
भाजपने आणलेला नदी सुशोभीकरण प्रकल्प कसबा विधानसभा मतदार संघासाठी घातक आहे. राडारोड्यामुळे नदीची वहनक्षमता कमी झाली आहे. त्यात आता या प्रकल्पामुळे वहनक्षमता आणखी कमी होणार आहे. महापौर व स्थायीच्या अध्यक्षांनी पुणेकरांचे हित पाहण्यापेक्षा वरिष्ठांची मरजी राखण्यास धन्यता मानली. त्यामुळे धंगेकर यांचा या निवडणुकीत विजय निश्चित आहे.
मेट्रो प्रकल्पाच्या बाजूला ४ एफएसआय देण्याचा निर्णय घेतला आहे. कसब्यात सर्वाधीक दाटीवाटीची घरे आहेत, मग येथे ४ एफएसआय कसा देणार, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. कोवीड काळात अजित दादांनी पालकमंत्री म्हणून चोख जबाबदारी पार पाडली. मात्र महापौर व स्थीच्या अध्यक्षांनी मनमाणी पद्धतीने काम केले, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही.
भाजप नेते ही पोटनिवडणुक स्थानिक प्रश्नावर लढवण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मते मागत आहे. मात्र पुणेकरांच्या बचावासाठी येणार नाहीत, त्यामुळे पुणेकरांनीच आपला विचार करून मतदान करणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीवेळी १५ लाख खात्यात येणार, कोट्यावधी नोकऱ्यायावर नागरिकांची फसवणुक झाली आहे, हे विसरता कामा नये. मोदी यांचा करिष्मा आता राहिलेला नाही, त्यामुळे या पोट निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर प्रचंड मताने विजयी होणार आहेत, असा विश्वासही अॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केसा.