आदित्य ठाकरे यांच्या बालभारती-पौडफाटा रस्त्याबाबतच्या भूमिकेवर माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची भूमिका…
पुण्यातील विकास प्रकल्पांचा ‘कांजूरमार्ग’ होऊ देणार नाही !
पुणे – टेकड्या ,नद्या ,नाले आणि एकूणच निसर्गाबद्दल काळजी घ्या,विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा विध्वंस करू नका असे सांगत पुण्यात वेताळ टेकडी ला शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंनी भेट दिल्यावर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरेंना टीकेचे लक्ष्य करत म्हटले आहे कि,’आदित्य ठाकरेंनी मुंबईतील आरे कारशेडचे काम थांबवून कांजूरमार्गच्या जागेवर तीन मेट्रो लाईन्सच्या कारशेडचा अत्यंत अव्यवहार्य पर्याय निवडला होता. स्वतःच्या ‘इगो’पायी मुंबईकरांच्या डोक्यावर १० हजार कोटींचा बोजा आला.पर्यावरणाचं रक्षण आणि ज्वलंत नागरी प्रश्नांची सोडवणूक यांचा समतोल न राखता येणाऱ्यांनी पुण्यात येऊन अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे काहीही बोलावे, हा मोठा विनोद आहे.
मोहोळ यांनी पुढे असेही म्हटले आहे कि,’आदित्यजी, मी स्वतः पुण्याचा महापौर राहिलेलो आहे. तुमच्यापेक्षा पुण्याची, पुणेकरांच्या नागरी प्रश्नांची आणि पर्यावरणाची आपल्यापेक्षा अधिक जाण आणि तळमळ आहे. कधीतरीच पुण्यात प्रकटून पुणेकरांबद्दलची खोटी आणि संधीसाधू तळमळ दाखवू नका.नदीकाठसुधार आणि बालभारती-पौडफाट रस्ता हे दोन्ही विकास प्रकल्प पर्यावरणाची काळजी घेऊनच पुढे नेण्यात येत आहेत. तरीही यावर काही पुणेकरांचे आक्षेप असल्यावर त्यावर निश्चितच सुचनांचा विचार करुन पुढे जाऊ.पण बालभारती-पौडफाटा रस्ता रद्दच करण्याची मागणी करण्याचा आदित्य यांना नैतिक अधिकार काय? केवळ विरोधाला विरोध म्हणून राजकारण करण्याच्या प्रयत्नांना सुज्ञ पुणेकर थारा देणार नाहीत.