पुणे-पुण्यातील अनाथालयात दाखल झालेली चार अल्पवयीन मुले पसार झाली आहेत.याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भारती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज परिसरातील भिलारवाडी याठिकाणी जनसेवा फाउंडेशनचे अनाथ व निराधार मुलांसाठी अनाथालय आहे. याप्रकरणी अविनाश संजय महामुनी (वय- 28 ,रा. कात्रज, पुणे )यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 21 एप्रिल रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. तक्रारदार अविनाश महामुनी हे काम करत असलेल्या जनसेवा फाउंडेशन मधील 12 वर्षाचा, 14 वर्षाचा, आठ वर्षाचा आणि नऊ वर्षाचा अशी चार मुले कुणीतरी आज्ञात इसमाने अज्ञात करण्यासाठी कोणतेतरी आमिष दाखवून फुस लावून पळून नेली आहे.
या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. मात्र ,अद्याप या पसार झालेल्या मुलांपैकी कोणीही मुलगा सापडला नसल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस जाधव यांनी दिली आहे.