पुणे- स्वामी नारायण मंदिराजवळ झालेल्या अपघातस्थळी भेट देऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी जखमीची भेट रुग्णालयात जाऊन घेतली. नवले पुलावर आणि नजीकच्या परिसरात अपघाताने मृत्यूंचे थैमान मांडलेले असताना गेली ६ वर्षे तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम सरकर करत आले आहे . खासदार सुळे यांनी हा विषय संसदेत मांडला तेव्हा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार झाल्याचे लोकांनी पहिले आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी सुळे यांनी यापूर्वी चर्चा केली आहे. पत्रकारांनी येथील अप्घातांवरून गडकरी यांना वारंवार छेडले आहे . पण प्रत्यक्षात ना अपघात थांबले ना मृत्यूंचे थैमान सरकार या विषयावर गंभीर नसल्याचे दिसून आले आहे . या पार्श्वभूमीवर आज खासदार सुळे यांनी घटनास्थळी माध्यमांशी संवाद साधला

तेव्हा त्या म्हणाल्या ,’आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पहाटे ट्रक आणि खासगी बसच्या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली व त्यांची विचारपूस केली. प्राथमिक माहितीनुसार ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. नवले पुलावर नोव्हेंबर मध्ये मोठा अपघात घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे, परंतू त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. या संदर्भात माझा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी यासंदर्भात लवकरच चर्चा करुन आणखी सुधारणा कशा करता येतील यावर भर देण्याचा प्रयत्न असणार आहे. रस्ते सुरक्षा हा खुप महत्वाचा विषय आहे, मी या संदर्भात संसदेत देखील मुद्दा मांडला आहे. त्यामुळे सर्व विभागाशी समन्वय साधून हा रस्ता अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, शरद दबडे, दिपक बेलदरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.