पुणे-
कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बस आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता.रविवारी मध्यराञी सव्वा दोन वाजता पुणे बंगलोर हायवे, नरहे-आंबेगाव, स्वामी नारायण मंदिराच्या उतारावर एक मोठा मालवाहतुक करणारा ट्रक व खाजगी बस यांचा अपघात झालार अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची ४ अग्निशमन वाहने व १ रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून १ रेस्क्यु व्हॅन अशी एकुण ७ अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली होती . या बचाव कार्यात अग्निशमन दलाकडून १८ जखमींची सुटका करण्यात आली आहे.
घटनास्थळी पोहोचताच अपघातग्रस्त दोन्ही वाहने पलटी झाल्याचे अग्निशामक दलाच्या जवानाचा निदर्शनास येताच घटनेचे गांभीर्य पाहून दलाचे अधिकारी व जवानांनी प्रथमत: बसच्या मागील बाजूची काच फोडून व काही जवानांनी वरील बाजूस जात दोरखंडाचा वापर करीत जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तसेच, पुढील बाजूस काही महिला व एक अंदाजे १५ वर्षाची मुलगी अडकली असता जवानांनी तिला अतिशय जिकरीचे प्रयत्न करीत जखमी अवस्थेत बाहेर काढले. अग्निशमन दलाकडून एकुण १८ जखमींना बाहेर काढले असून त्यांना शासनाच्या १०८ या रुग्णवाहिकेतून जवळपास असणाऱ्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खाजगी बस एमएच ०३ सीपी ४४०९ निता ट्रॅव्हल्स कंपनीची असून कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. मालवाहतुक करणारा मोठा ट्रक एमएच १० सीआर १२२४ यामधे मोठ्या प्रमाणात साखरीची पोती घेऊन जात होता. पुण्यातील नरहे आंबेगाव नजीक मालवाहू ट्रक व खाजगी बसचा अपघात झाला. त्यानंतर अग्निशमन दलाकडील नवले, सिहंगड, काञज, कोथरुड येथील फायरगाड्या व मुख्यालयातून एक रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए १ रेस्क्यु व्हॅन दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाकडून विविध अग्निशमन उपकरणे स्प्रेडर, कटर, लिफ्टिंग बॅग, पहार, कटावणी, फुट पंप वापरण्यात आली आहेत. तसेच जखमींना १०८ च्या ६ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना करण्यात आले.