पुणे-आगामी विधानसभा निवडणुकामध्ये मेहेतर वाल्मिकी समाजाला काँग्रेस पक्षाने संधी द्यावी , अशी मागणी मेहेतर वाल्मिकी समाजाच्या महत्वपूर्ण बैठकीत निर्णय घेण्यात आला . क्वीन्स गार्डनमधील इन्स्पेक्शन बंगलोमध्ये मेहेतर वाल्मिकी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली होती . या बैठकीस पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व माजी नगरसेवक करण मकवानी , राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दीपक निनारिया , मीरा शिंदे , अक्षय चरण , सिध्दांत सारवान , कामगार नेते प्रताप सोळंकी , मेहेतर वाल्मिकी रुखी समाज सुरक्षा संघाचे अध्यक्ष राजन चंडालिया , पुणे शहर मेहेतर वाल्मिकी समाजाचे पंच प्रमुख सुनील चव्हाण , लष्कर बेडा पंचायतचे पंचप्रमुख विनोद परदेशी , किशोर साळुंके , महेंद्र लालबिगे , अखिल सफाई मजदूर काँग्रेसचे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष अरविंद सुसगोहेर , ससून रुग्णालयाचे इंटकचे अध्यक्ष प्रमोद निनारिया , हितेश मकवानी , जितेंद्र डिकाव, राजेश परदेशी , विशाल गोहेर , गौरव सारवान , सोमनाथ गाडे , जितीन परदेशी , राजेश मकवानी , नितीन चव्हाण , नितीन परमार , अमित छत्रे व मोठया संख्येने मेहेतर वाल्मिकी समाज बांधव उपस्थित होते .
यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व माजी नगरसेवक करण मकवानी यांनी सांगितले कि , मेहेतर वाल्मिकी समाज हा राजकारणापासून वंचित राहिलेला समाज आहे , या समाजाला लोकप्रतिनिधित्व देण्याची गरज आहे . आपण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात नगरसेवक म्हणून सर्व समाजाला बरोबर घेऊन काम केले आहे . पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात अनेकांना नोकरी मिळवून दिली . आपण कामाच्या जोरावर मेहेतर वाल्मिकी समाजाला आगामी विधानसभा निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाने संधी द्यावी . येत्या ३ जुलै २०१९ रोजी आपण मेहेतर वाल्मिकी समाजाचे शिष्टमंडळ घेऊन मुंबई येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांना भेटणार आहोत . आपण कामाच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर काँग्रेसने आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीत संधी द्यावी . तसेच समाजातील पंचायत प्रमुख , काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत . समाजानेदेखील आपला स्वाभिमान जागा केला पाहिजे . समाजाने समाजाचा विचार केला तर समाजाला भवितव्य राहील अन्यथा आपल्या समाजाला मोठे राजकीय नुकसान होणार आहे . त्यामुळे समाजाने जागे झाले पाहिजे .
या बैठकीचे सूत्रसंचालन दीपक निनारिया यांनी केले तर आभार हितेश मकवानी यांनी मानले .