२४व्या संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प
पुणे: “ आम्हाला स्वतःमध्ये असलेल्या संभाव्यतेबद्दल माहिती नाही. याची जागरूकता हीच प्रचंड ऊर्जा निर्माण करेल. मी कोण आहे. या प्रश्नाचे उत्तर हे ओम या शब्द ध्वनीच्या माध्यमातून मिळते. यातून निर्माण होणारी ऊर्जा ही चैतन्य शक्ती जोडते. करोडो वर्षापूर्वी या सृष्टीवरील प्रत्येक वस्तूत ऊर्जा होती. त्याच ऊर्जेचा वापर आज वेगवेगळ्या माध्यमातून केला जात आहे..” असे विचार महाराष्ट्र शासनाच्या सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी व्यक्त केले
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या द्वितीय पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत हेाते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.एस. परशूरामन, डॉ. जयंत खंडारे, श्री तुळशीराम दा. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू व व्याख्यानमालाचे समन्वयक प्रा.डॉ. मिलिंद पांडे व प्र कुलगुरू प्रा.डी.पी. आपटे हे उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले,“ सर्वात लहान कणातील सर्वात लहान आणि विश्वशातील सर्वात मोठ्या वैश्विक वस्तूमध्ये बरेच संबंध आहेत. खर तर आपण आज जे विश्व पाहत आहोत ते असंख्य वर्षापूर्वीच्या मोठ्या स्फोटाचाच परिणाम आहे. तेथे एक अतिशय लहान कण होता आणि तो गुरूत्वाकर्षण विद्यूत चुंबकीय आणि अणु शक्ती ईत्यीदी मुळे फुटला. आपण परिघाकडे आल्यास, आपल्याला बर्याच आकाशगंगे दिसतात. आमची कल्पनाशक्ती आणि निरीक्षणाचा प्रवास चालूच आहे. शेवटी आपण आपल्या सौर मंडळावर पोहोचतो. पुढील भाग पृथ्वीचा जन्म आणि एका जीवची निर्मिती आपल्यास माहिती आहे. विश्वाच्या तुलनेत आपण अगदी लहान आहोत.”
डॉ. जयंत खंडारे म्हणाले,“ आपल्या प्रत्येकाला कॅन्सरीचे दुषपरिणाम माहिती असतो. पण ते बरे करणे हे देखील शक्य झाले आहे. प्रारंभिक टप्यावर त्याचे निदान झाले पाहिजे. आम्ही लहान आजारांकडे दुर्लक्ष करतो. पण तो कॅन्सरचा प्रारंभ बिंदू असू शकतो. जर आपण डॉक्टरांकडे गेलो आणि जर त्यांनी वेगवेगळ्या चाचण्या सुचविल्या तर ते करणे चांगले. प्राथमिक चाचण्या दरम्यान कॅन्सरचे अस्तित्व कळू शकते. म्हणूनच कॅन्सरचा प्रद्रुर्भाव प्राथमिक टप्यावर झाल्यास तो बरा होऊ शकतो. प्रत्येकाने आरोग्यबद्दल जागरूक असले पाहिजे. जर तसे असेल तर आपण जगातून कॅन्सर नाहीसा करू शकतो.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ प्रत्येकाने विज्ञान, अध्यात्म आणि गणिताला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक समजून कार्य करावे. संपूर्ण विश्व हे चैतन्य व बुध्दिमान आहे. कणा कणात चैतन्य आहेच. त्यामुळे त्याचे सखोल ज्ञान घेणे गरजेचे आहे. श्रध्दा,निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे आपल्याला ज्ञान मिळते. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. डॉ.खंडारे यांनी केलेले संशोधन हे अतुलनिय आहे. त्यामुळे भविष्यात या संस्थेतून एकतरी नोबेल लॉरेट्स निर्माण होईल यात मला किंचितही शंका वाटत नाही.”
सकाळच्या सत्रात दर्शन मुंदडा म्हणाले, “सर्व जगात जे म्हणून मोठे घुमट आहेत, त्यामध्ये राजबाग लोणी काळभोर येथे असलेला घुमट सर्वात श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वर हा केवळ सर्वात मोठा नाही तर तो गुणात्मक दृष्या मोठा आहे. ५४ संत, शास्त्रज्ञ व तत्वज्ञ यांच्या पुतळ्यांमुळे तो विश्वशांतीचा संदेश वाहक बनला आहे.”
विनोद जाधव म्हणाले,“ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक पैलू जगाला किंवा त्यांच्या अनुयायांना सुद्धा अज्ञात आहेत. एक जगविख्यात अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी देशाला मोठे योगदान दिले आहे. त्यांनी सादर केलेला डॉक्टरेटचा प्रबंध जागतिक पातळीवर मान्यता पाऊन त्यानुसार समितीसुद्धा कार्यरत झाली.”
प्रसिद्ध ईएनटी सर्जन डॉ. गोविंद पालकर यांनी सुद्धा आपले विचार मांडले. डॉ. मिलिंद पत्रे यांनी ओंकार ध्यान धारणेचे प्रात्यक्षिक घडविले.
डॉ. मिलिंद पांडे यांनी स्वागत पर भाषण केले.
प्रा. अनघा खरे यांनी सूत्रसंचालन केल. प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.