पुणे मिडिया वॉच व सिद्धार्थ वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित मराठी पत्रकार दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला . नवी पेठमधील पुणे श्रमिक पत्रकार भवनमध्ये झालेल्या या सोहळ्यामध्ये जेष्ठ पत्रकार भागा वरखडे यांचे ” लोकपत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आजची पत्रकारिता ” या विषयावर व्याख्यान झाले . तसेच पत्रकार बांधवांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमास राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे , माजी नगरसेवक उस्मान हिरोली , डॉ. भगवान यादव , जेष्ठ पत्रकार अविनाश गोडबोले , कार्यक्रमाचे सयोजंक सिद्धार्थ वाचनालय व ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला , पुणे मिडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर आदी मान्यवर उपस्थित होते .
या सोहळ्यामध्ये ” राजकीय वार्ताकन पत्रकार पुरस्कार ” राजेंद्र पंढरपुरे , फुले शाहू आंबेडकर चळवळीतील ” नामदेव ढसाळ पुरस्कार ” नाना गायकवाड , ” महिला पत्रकार पुरस्कार ” दीप्ती नितनवरे , ” गुन्हेगारी वार्तांकन पुरस्कार ” नितीन पाटील ,” उपनगर वार्ताहर पुरस्कार ” विशाल केदारी , ” उर्दू पत्रकार पुरस्कार ” मुनाफ अब्दुल मजिद शेख ,” वृतपत्र लेखक पुरस्कार ” राहुल भोसले ,” वृतपत्र छायाचित्रकार पुरस्कार ” आरूळ होरायजन ,” वृतपत्र विक्रेता पुरस्कार ” वैजनाथ कानडे – , ” सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय पुरस्कार ” डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय – ताडीवाला रोड आदींना स्मृतीचिन्ह , शाल व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी ” लोकपत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आजची पत्रकारिता ” या विषयावर जेष्ठ पत्रकार भागा वरखडे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले कि , बाबासाहेबांची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात फरक आहे . बाबासाहेब यांचा लढा सामाजिक विषमतेविरुद्ध होता ज्यांचा वेदना कुणी समजून घेत नव्हते अशा मूक लोकांचे ते प्रतिनिधी होते . बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व तत्कालीन भारतीयांच्या आणि वृत्तपत्रांच्या दृष्टीनेही अस्पृश्य होते त्यासाठी बाबासाहेबांना आपल्या आंदोलनाची माहिती , उपक्रमाची माहिती लोकांना व्हावी , आपले विचार लोकापर्यंत पोचावेत यासाठी त्यांनी नियतकालिक काढावी वाटली . बाबासाहेबांनी सन १९२० मध्ये मूकनायक सुरु केल ते दीड वर्ष टिकल . त्यानंतर सन १९२७ मध्ये बहिष्कृत भारत सुरु केल . ते दोन वर्षे टिकल त्यानंतर मात्र जनता सुरु केल ते मात्र २६ वर्ष टिकल . त्यांच्या नियतकालिकांची नाव लक्षात घेतली तरी ते कुणासाठी काम करीत होते . पुढे जनताच नाव प्रक्षुब्ध भारत झाल . त्यांनी त्यांच्या नियतकालिकांच्या बाबतीत कधीही गुणवत्तेशी तडजोड केली नाही . रात्रभर जागून त्यांनी संपादकीय लिहिली . त्यांचे अग्रलेख हे उत्कृष्ट साहित्याचे नमुने होते . नेते आणि पत्रकार यांचा राजकीय सुधारणावर भर होता बहुतांश पत्रकारांची आणि राजकीय नेत्यांचा स्वराज्याचा आग्रह होता तर बाबासाहेबांचा मात्र सुराज्याचा आग्रह होता . बाबासाहेबांच्या वेळची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात बरेच साम्य आहे आताही मोठ्या लोकांचा , भांडवलदारांचा ज्या पद्धतीने उदोउदो केल जात आहे , पेज थ्री संस्कृतीच्या काळात सामान्य माणूस आणि ग्रामीण भागाचे प्रश्न कसे मागे पडत आहे . लोकांच्या जीवनमरणाचे प्रश्न मांडले . तर रडगाण्याचे आपले अंक कोण विकत घेणार , असा प्रश्न ज्यांच्या हातात वृत्तपत्र आहेत , त्यांना पडतो आहे .
अलीकडच्या काळात पेड न्यूज , कार्पोरेट आणि मीडिया हाउसमधील लागेबांधे , ब्लेकमेलिंग , रीडरशिपचे तथाकथित सर्व्हे यामुळे वृतपत्र आणि पत्रकाराबद्दलचा विश्वास लयाला जात आहे . आपली पिढी टेक्नोसेव्ही जरूर झाली , परंतु वैचारिक खोली आपल्या लिखाणात आहे का , याचा विचार आपण करणार करतो का ? हा महत्वाचा प्रश्न आहे . या व्यवसायात अनेक प्रलोभने आहेत , प्रसिद्धी मिळते परंतु आर्थिक स्थैर्य आहे का हा खरा प्रश्न आहे . समाजातील उपेक्षित घटकांना आपण किती स्थान देतो त्यांच्यासाठी आपली किती जागा असते हे पाहिलं तर वस्तुस्थिती स्पष्ट होईल .
देशात एक लाखाहून अधिक वृतपत्र निघतात , जगभर वृत्तपत्राचा खप कमी होत असला तरी भारतात ५. ९ टक्क्यांनी वृत्तपत्राचा खप वाढला आहे . वाहिन्यांची संख्या हजारोत आहे , एका तालुक्याच्या ठिकाणी पाच स्थानिक वाहिन्या चालतात , हे चित्र आपल्याला सुखकारक वाटायला हव . रोजगाराच्या संधी वाढताहेत , असा अनुभव यायला हवा , परंतु तस प्रत्यक्षात होताना दिसत नाही , स्थानिक वाहिन्या या राजकारण्यांना हाताशी धरून त्यांच्या पैशान किंवा पाठबळान काढलेल्या दिसतात . पेड न्यूजसारखे प्रकार तेथे होतात , त्यामुळ एकूणच पत्रकारांकड ज्या तुछतेच्या दृष्टीने पाहील जात ती बदलण्याच मोठ आव्हान आपल्यापुढे आहे
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत पुणे मिडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर यांनी केले तर सुत्रसंचालन सिद्धार्थ वाचनालय व ग्रंथालयाचे ग्रंथपाल दिलीप भिकुले यांनी केले तर आभार वाहिद बियाबानी यांनी मानले .