पुणे- उपचार पद्धती ठरलेली असताना ,लशीची मदत सुरु असताना आरोग्य यंत्रणेला दिशा प्राप्त असताना का होते आहे पुणेकरांची दशा , का होत आहेत हाल अपेष्टा , अहो महापौरसाहेब तुम्ही पुणेकरांना आरोग्य सुविधा तरी व्यवस्थित देणार आहात कि नाही …? असा सवाल महापालिकेतील विरोधीपक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केला आहे.
दरम्यान आज धुमाळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनाही पत्र दिले आहे, या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि,’पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण झपाट्याने वाढत आहे.गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात रोज 7 हजाराच्या वर रुग्णांची संख्या आहे. वाढत असलेल्या रुग्णांच्या संखे च्या मानाने महानगरपालिकेतर्फे आवश्यक ती योजना झाल्याचे दिसत नाही.प्रशासन या संबधी अनेक उपाययोजना व निर्णय व धोरण ठरवत आहे. परंतु याला फारसे यश मिळत नाही. उलट अधिकच परिस्थिती गंभीर होत चाललेली दिसत आहे. अनेक ठिकाणी समस्या आहे मग त्या कोर॔नटाईन केलेल्या रूग्णाच्या बाबतीत असतील किंवा बेड्स बाबत असतील. बाधित रुग्णांना रेमडीसिवेर इंजेक्शन्स उपलब्ध होत नाही.ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नाही.
व्हेंटीलेटर बेड्स उपलब्ध होत नाहीत. कोरोना लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होत आहे.कोरोना टेस्ट ची तुटवडा होत आहे.अनेक रुग्ण बेड्स न मिळाल्यामुळे घरीच राहात आहेत. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा बेड्स उपलब्ध होत नाही,त्यामुळे नाहक रुग्णांचा बळी जातो. तसेच सस्पेक्टेड रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. व त्यांना कुठल्याही दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येत नाही. सस्पेक्टेड रुग्णांना ना घरी राहता येते ना दवाखान्यात त्यांच्यासाठी बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तरी अशा रेस्पेक्टेड रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयात व पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात स्वतंत्र राखीव बेड उपलब्ध करण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावे. तसेच स्वॅब टेस्ट केल्यानंतर ३ दिवसानंतर रिपोर्ट येतो व संशयित रुग्ण रिपोर्ट येईपर्यंत बाहेरच फिरत असतात किंवा घरी असतात. त्यामुळे जर त्याच्या मध्ये पॉझिटिव पेशंट असतील तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे घरातील लोकांची व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी अ शा रुग्णांसाठी सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या व खाजगी रुग्णालयात स्वतंत्र बेड देण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणी हि विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.