पुणे- खा. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर ; २५ वर्षापासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची सत्ता होती , पूर प्रश्नी राजकारण करू नये असे म्हणणाऱ्या महापौरांना विरोधी पक्षनेत्यांनी जोरदार टोला लगावला आहे. स्थायी समिती अध्यक्ष तुम्ही होतात एकदा नव्हे दोनवेळा बजेट तुम्ही केले ,त्यानंतर महापौर हि झालात … या चार वर्षात १०० मुखी फौज तुमची आहे असे असताना नैसर्गिक संकट म्हणून तुम्ही पाठ फिरवू शकत नाही तुम्ही संकटांवर मात करण्यासाठी काय केले .असा सवाल विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. त्या म्हणाल्या , खासदार सुळे यांनी कात्रज पूरग्रस्तांच्या पाहणीनंतर केलेले वक्तव्य सत्य आहे म्हणूनच यांना लागलेले आहे. पुणे पाण्यात गेले असताना हे राजकारण करू नका म्हणतात … हे वक्तव्य असमंजस पणाचे आहे. रस्ते दुथडीभरून वाहत होते. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असेल शहराचा भाग असेल ,उपनगरे असतील सर्वच ठिकाणी पाणी शिरले होते. पाउस पडणार , आता तो जास्त आणि कमी काय महापौरांचे राजकारण पाहून पडणार काय ? झोपेचे सोंग घेऊन काहीतरी बोलून त्यांच्यावरचे बालंट टळेल असे त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. पाऊस काल एवढा झाला , पुढे अजून जास्ती होईल किंवा कमी होईल .. पावसाचे संकट कसे म्हणता येईल आपण निसर्गाच्या प्रत्येक हालचालीला कसे सामोरे जातो ते महत्वाचे आहे . आणि या चार वर्षात महापालिकेतील हे सत्ताधारी वेगळ्याच विश्वात रमलेले आहेत . त्यांनी जनतेची फिकीर केलेली दिसत नाही .म्हणूनच जे २५ वर्षात झाले नाही ते या चार वर्षात होते आहे. खऱ्या वास्तवतेचा सामना करण्यास सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी पुढे आलेलेच नाही हेच पुण्याचे दुर्दैव आहे.