कोरोना प्रकरणी महापौरांच्या दुटप्पी भूमिकांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रहार (व्हिडीओ)
महापौरांनी फक्त सोशल मीडियावर अपडेट देण्याऐवजी जनतेसाठी सोयीसुविधा द्याव्यात
पुणे – पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. मात्र, या वाढत्या रुग्ण संख्येला पुणे महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याची टीका महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या शहराध्यक्षांनी केली आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे आणि शिवसेनेचे संजय मोरे उपस्थित होते.महापौर हे विरोधी पक्षानांच काय ,पण भाजपमधील आपल्या सहकारी नगरसेवकांनादेखील विश्वासात घेत नसल्याची टीका त्यांनी केली .१० ते १२ वेळेत गर्दी होते म्हणून महापौर
पोलिसांकडे अगोदर दुकानांसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी करतात . आणि राज्य सरकारने दुकानांना वेळ वाढवून दिली, आणि महापालिका आयुक्तांनी त्याची अंमलबजावणी सुरु केली मग मात्र विरोध करतात याला राजकारण म्हणायचे नाही तर काय ? आणि या स्थितीत भाजपचे खासदार ,आमदार काय करीत आहेत असा सवाल हि त्यांनी केला .
तर भवानी पेठेत झोपडपट्टीत राहणाऱ्यांना सल्ले देणे सोपे आहे, पण ते १० बाय १० च्या खोलीत ७/८ लोक कसे राहतात ? त्यांची उपजीविका कशी चालते ? याबाबत भाजपच्या पदाधिकार्यांना कदाचित माहिती नसावी .गरिबी वाईट असते त्यांना सल्ले देणे सोपे आहे . ७० हजार कुटुंबे हलविणार अशा घोषणा करण्यात आल्या प्रत्यक्षात काही नाही . या सर्वांना अगोदर महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य महापालिका प्रशासनाने द्यावे आणि नंतर त्यांच्यावर निर्बंधे घालावीत हवे तर नंतर मग मिलिटरी बोलवा कारवाई करा .असे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. असे सांगतानाच श्रेय कोणीही घ्या मात्र परिस्थिती आटोक्यात आणा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावेळी केली.
पालिकेच्या नायडू सारख्या रुग्णालयात आजच्या घडीला डॉक्टरांकडून एक्स-रे मशीन बंद केली जात आहे. ही खेदजनक बाब असून, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.तपासण्या घेण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही
अशी टीका शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केली. तसेच फार्महाऊसवर बसून कार्यकर्त्यांना कामाला लावून कोरोना जाणार नाही. यासाठी रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी म्हटले आहे.