पुणे, दि.६ मार्चः कुंभमेळ्याचे महत्व सांगण्याच्या उद्देशाने “कुंभ संदेश यात्रे” चा प्रारंभ तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथील विवेकांनद केंद्रातून नुकतीच झाला आहे. ग्रामोद्यय चेंबर ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी द्वारा आयोजित २५ दिवसांची व जवळपास ५ हजार कि.मीची ही यात्रा हरिद्वार येथे संपन्न होईल. या यात्रेत एकूण १२ व्यक्तींचा समावेश आहे. या यात्रेचे आगमन ४ मार्च रोजी पुण्यात झाले असून ६ रोजी नाशिक मार्गे उजैन, प्रयागराज, दिल्लीकडे प्रस्थान करेल. यात्रेतील यात्रेकरू दिल्ली येथून हरिद्वारसाठी पायी प्रस्थान करणार आहेत.
या यात्रेला दिव्य प्रेम सेवा मिशनचे अध्यक्ष डॉ. आशिष गौतम, माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन, संतोष गुप्ता, श्री.जी. वासुदेव, नाइनर नागेंद्रन, डॉ. प्रताप रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखविला. या वेळी विवेकानंद आश्रमचे चैत्यानंद महाराज व तमिळनाडू येथील भाजपाचे राष्ट्रीय सह प्रभारी पोंगुलेती सुधाकर रेड्डी यांची प्रमुख उपस्थित होती.
युवकांमध्ये प्राचिन भारतीय संस्कृती आणि परंपरा रूजविण्यासाठी आणि आयातित पाश्चात्य प्रथा सोडून देणे हे यात्रेचे उद्दिष्ट आहे. कुंभमेळा घेतल्या जाणार्या नाशिक, उज्जैन, प्रयागराज आणि हरिद्वार चार प्रमुख आध्यात्मिक केंद्रांना ही यात्रा स्पर्श करेल. तसेच, कुंभ संदेश यात्रा देशातील आठ ज्योतिर्लिंग क्षेत्र व्यापणार आहे.
कुंभमेळ्यात एकत्र येण्यासाठी आणि बदललेल्या सामाजिकपरिस्थितीच्या संदर्भात संदेश मिळावा म्हणून त्यांचे अधिग्रहण केलेले ज्ञान सामायिक करण्यासाठी देशातील विविध प्रांतातील आपल्या संत आणि ऋषींच्या प्रदीर्घ काळाच्या प्रथेला कुंभ म्हणतात. जीवशास्त्रीय, समाजशास्त्र आणि मानवी जीवन जगू शकतील अशा इतर सर्व पैलूंच्या चक्रीय बदलांच्या आवश्यकतांवर कुंभ लक्ष देतो. कोविडोत्तर जगातील सर्वच साथींचे रोग आणि सर्वत्र पसरलेली परिस्थिती लक्षात घेता कुंभ संदेश यात्रा जगभरातील नागरी समाजांशी सुसंगतेवर भर देण्यासाठी सुरू करीत आहोत.
अशी माहिती एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या पहिल्या तुकडीचा विद्यार्थी, जीसीओटीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आणि कुंभ संदेश यात्रेचे आयोजन समितीचे सचिव दिल्ली वसंत, कार्यकारी अध्यक्ष मानकेना श्रीनिवासा रेड्डी, अरिगय रामस्वामी मेमोरिअल सर्व्हिसेसचे अध्यक्ष अरिगय मधु सुदन, सीईओ श्रवण कुमार मडप, राजू व्ही.के., डॉ. प्रसाद पासम, डॉ. पद्मावती व एमआयटी स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीचे वरिष्ठ संचालक श्री. रविंद्रनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.