पुणे(रवी नितनवरे )-जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अंडी उबवणी केंद्राजवळ चक्क जाहिरात फलक उभारण्यासाठी वृक्ष तोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या संरक्षक भिंतीजवळ हा पराक्र मोठ्या हिकमतीने करण्यात आला . लोकांच्या लक्षात येवू नये म्हणून एक -एक फांदी छाटत काही दिवसात येहील झाडच गायब करण्यात आले. आणि तिथे आता चक्क जाहिरातफलक उभारण्यासाठी महापालिका आकाश चिन्ह विभागाने परवानगी दिल्याचे वृत्त हातही आले आहे.
पुणे तिथे काय उणे म्हणतात ..अर्थात इथे वान्ग्ल्या वृत्तीची कमतरता नाही तशी चांगल्या वृत्तीचीही नाही ..पण तरीही पुणे तिथे वृक्ष उणे होत चालल्याचे स्पष्ट चित्र आहे. पुणे मुंबई जुन्या महामार्गावर अयाझ काझी,ताहेर काझी यांच्यानंतर आता अब्रार आणि बिलाल काझी यांनी येथील झाडे वाचविण्यासाठी वारंवार महापालिका आणि संबधित यंत्रणाकडे पाठपुरावा सुरु ठेवला आहे . .एका अधिकाऱ्याच्या नादाला लागून भाई बनलेल्या कलमाडी नी बीआरटी च्या मार्गाने आपली सत्ता गमावली . त्याच बीआरटी ची री ओढल्याने अजितदादांनी मिळविलेली सत्ता गमावली आणि आता १०० बाहूंचे बल मिळालेल्या भाजपाला देखील प्रशासनातील अशाच बाबींनी ,प्रवृत्तींनी हैराण करून सोडले आहे. निव्व्वळ शासकीय यंत्रणांवर पुणे अवलंबून राहिले असते तर आजवर ते नामशेष झाले असते,पण चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांची उणीव इथे नाही येथील वृक्षांच्या कत्तलीची बाब आता समाजकार्यात हिरारारीने भाग घेतलेल्या काझी यांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे . महापालिका आता यावर काय भूमिका घेणार …. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.