जिओथर्मल ऊर्जाविषयी जनजागृती आवश्यक
डॉ. नितीन करमाळकर यांचे मत; मराठी विज्ञान परिषदेतर्फे परिसंवाद
पुणे : भारतात भूगर्भीय ऊर्जा अर्थात ‘जिओथर्मल ऊर्जे’चा उपयोग होणे गरजेचे आहे. हे कोणतेही ‘रॉकेट सायन्स’ नसून ते पूर्वापार पासून आपल्याकडे उपलब्ध आहे. जिओथर्मल ऊर्जा या विषयाबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे, यासाठी सरकारकडून प्रोत्साहन दिले गेले जावे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इन्डिया), पुणे स्थानिक केंद्र आणि मराठी विज्ञान परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या बी. जे. वाळिंबे स्मृती व्याख्यानमालेत डॉ. करमाळकर यांचे ‘जिओथर्मल ऊर्जा’ या विषयावर दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या फिरोदिया सभागृहात व्याख्यान झाले. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स पुणेचे अध्यक्ष प्रा. के. के.घोष यांनी स्वागत केले. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ यांनी स्मृती व्याखानाच महत्त्व सांगितले तर आर. बी. बाळींबे यांनी बी. जे. वाळिंबे यांचे जीवन चरित्र सांगितले.
”सौर उर्जेसोबत जमिनी मधील जिओथर्मल ऊर्जा शोध घेऊन त्याचा उपयोग केला जावा. यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेले गरम पाण्याचे झरे यांचा समावेश होतो. या गरम झऱ्यांना औषधी मूल्यं आहे, तसेच त्याचा वापर ऍक्वा कल्चर, फिशरी आदीविविध गोष्टीसाठी होऊ शकतो. पुगा व्हॅली, लदाख व हिमाचल प्रदेश सारख्या ठिकाणी जिओथर्मल ऊर्जेच्या मदतीने वीज निर्मिती होऊ शकते.जिओथर्मल ऊर्जा हि पूर्वापार उपलब्ध असलेली गोष्ट आहे परंतु आपल्याकडे त्याला विविध धार्मिक कहाण्या जोडल्या गेल्यामुळे त्याचा वापर अधिक प्रमाणात झाला नाही. लडाख मध्ये विजेचा पुरवठा फक्त तीन तास असतो आणि तापमान उणे दहाच्या खाली असते. अभ्यास व संशोधन केल्यावर असे आढळले की येथे जिओथर्मल उर्जेचा पणे वापर होऊ शकतो. महाराष्ट्रात कोकण भागात २०० च्या वर उष्ण झरे आहेत. जिओथर्मल उर्जेचा वापर प्रभावीपणे होणे महत्वाचे आहे,” असे करमाळकर म्हणाले.
कराड नगरपालिकेला २०१९ मध्ये भारतातील ‘स्वच्छ शहर’ म्हणून गौरविण्यात आले. या व्याख्यानमालेत कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी ‘स्वच्छ भारत मिशनमध्ये कराडची यशोगाथा’ या विषयी त्याचे अनुभव सांगत प्रवास उलगडला. यशवंत डांगे म्हणाले, ”लोकसहभाग, इच्छाशक्ती, शासनाच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी या माध्यमातून कराड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचे काम अविरत सुरु आहे. या कामात कराड नगरपालिका, प्रशासन, नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था यांच्या मदत घेतली जात आहे. कचरा वर्गीकरण विलनीकरण याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते. घंटागाड्यांमध्ये कचरा जमा न करणाऱ्या घरामधून कचरा ‘ट्रकिंग’ केले जाते. कराडमध्ये ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण शंभर टक्के होते. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी माहिती पत्रके वाटप, प्रत्यक्ष भेटी यावर भर देण्यात येत आहे. श्रमदान, वृक्षारोपण, ‘चालत बोलता कचरा उचलणे’, ‘टाकाऊतुन टिकावू’ अशा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन केले जाते. येथील सार्वजनिक स्वच्छतागृहे स्वच्छ व ‘लॅव्हिश’ ठेवण्यात आली आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली गेली. यंदाच्या वर्षात तीन लाखाच्या घरात दंड वसून करण्यात आला. गोळा,केलेल्या कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहे. शहरात प्लॅस्टिकचा वापर पूर्णतः बंद आहे. घरे किंवा सोसायटी परिसरातच कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्याकडे कल असतो. राजेद्रकुमार सराफ यांचा सल्ला कराड नगर परिषदेला नेहमीच मिळत असतो असे सांगितले”.
डॉ. प्रमोद देशपांडे, आणी डॉ. नीलिमा राजूरकर यांनी ओळख करून दिली. डॉ. सुवर्णा टिकले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. अनुराधा देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले