धनकवडी सांस्कृतिक मंचातर्फे कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मान
पुणे : भारताचे दुसरे राष्ट्रपती व प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्वादाचा तात्त्विक परिचय करून दिला. भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांच्याकडे पाहिले जाते. तर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात फिल्डमार्शल सॅममाणेकशॉ यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या मुत्सद्दीगिरीमुळेच अनेकजण शरण आले होते. असे हे दोन भारतमातेचे सुपुत्र अनमोल असून, त्यांचे कार्य अतुलनीय आहे,” असे प्रतिपादन व्याख्याते आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी केले.
धनकवडी सांस्कृतिक मंचाच्या वतीने नुकतेच सांस्कृतिक शिबीर आणि समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱया महाराष्ट्रातील व्यक्तींचा विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे अध्यक्ष रविंद्र मोहन धारिया होते. प्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, भारतीय बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष मदन कोठुळे, प्रमुख संयोजिका ॲॅड. वैशाली भोसले नितीन भोसले, ऋतिका कदम आदी उपस्थित होते.
रविंद्र धारिया यांनी सत्कारार्थीचे अभिनंदन केले. जयमाला इनामदार यांनी सादर केलेल्या गाढवाचे लग्न नाटकातील प्रसंगाने उपस्थितांमध्ये हास्य फुलले. ऋतिका कदम यांनी स्वामी विवेकानंद आणि बिरबल यांच्या जीवनातील वेगळेच प्रसंग सांगून कार्यक्रमाची उंची वाढवली. कार्यक्रमात एकूण २४ लोकांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि फिल्डमार्शल सॅममाणेकशॉ पुरस्काराने गौरवण् यात आले. ॲड. वैशाली भोसले यांनी प्रास्ताविक केले. भैरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन भोसले यांनी आभार व्यक्त केले