पुणे- : शहरात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून संततधार पावसामुळे नदी, नाले, ओढे व छोटी धरणे तुंडुब भरली आहेत. दक्षिण पुण्यातील नागरिकांसाठी आकर्षणबिंदू ठरलेला आंबेगाव खुर्द जांभूळवाडी तलाव पुर्ण क्षमतेने भरून वाहू लागला असून याची पाहणी करण्यासाठी प्रभाग क्रमांक ४० च्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी तलावाला भेट दिली. यावेळी उपस्थित महिलांसमवेत कोंढरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात तलावाचे ओटीभरण व जलपूजन करण्यात आले.
जांभूळवाडी तलाव हा आकाराने लहान असला तरी सध्या पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. कोळेवाडी, जांभूळवाडीतील डोंगर भागातून वाहणारे जरे, ओढे, नाले हे तलावाचे पाणी भरण्याचे मुख्य नैसर्गिक स्त्रोत आहेत. तलाव शंभर टक्के भरल्याने तलावातील अतिरिक्त पाणी नैसर्गिकरित्या पुर्वेकडील पुलाखालून वेगाने ओढ्यात जात असल्याने आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक परिसरातून जाणारा ओढा तुंडुब भरून वाहू लागला आहे. मात्र पावसाच्या पाण्याबरोबरच उतारावरून वाहून येणारी माती व गाळ यामुळे तलावाच्या साठवणूक क्षमतेवर परिणाम झाला असून प्रदूषण सुद्धा वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी तलावाचे प्रदूषण कमी करण्यास प्राधान्य दिले जाणार असून आगामी काळात खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, नगरसेवक गणेश ढोरे यांच्या माध्यमातून तलावाचे सुशोभीकरण करून तलावाचे पाणी परिसरातील नागरिकांना वापरात येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी शालन जांभळे, मालन जांभळे, स्वाती शिरोळे, वृषाली जांभळे, अश्विनी कोंढरे, दीप्ती सुतार, पल्लवी कोंढरे, वर्षा नरसाळे, हेमा वाघमारे, मिनाबाई ओव्हाळ तसेच जनहित विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष सुधिर कोंढरे, मारुती जांभळे, विजय शिरोळे, किशोर कोंढरे, सुधिर कोंढरे, बापूराव जाधव, अमोल कोंढरे, महेंद्र कोंढरे उपस्थित होते.