पुणे- विकास काय असतो ते दाखवून देण्याची जबाबदारी आपली आहे हे मानणारा आमचा पक्ष असून त्याबाबत मी आणि माझे सहकारी ,’या महापालिका निवडणुकीपूर्वीच विकास काय असतो ते निश्चित दाखवून देऊ असा विश्वास व्यक्त करीत महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी राज्य सरकारनेही यासाठी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे आणि सरकार तो देईल असाही विश्वास आज ‘माय मराठी’ शी बोलताना व्यक्त केला आहे.
सभागृह नेते पदाची सूत्रे हाथी घेतल्यानंतर काही बैठका, आणि काही प्रकल्पांची माहिती घेऊन झाल्यानंतर बिडकर यांनी ‘माय मराठी’ शी संवाद साधत सांगितले की,’जबाबदारी मानण्याची परंपरा भाजपा मध्ये आहे.आणि या जबाबदारीला न्याय देण्यासाठी निश्चित न्याय देण्यासाठी अनेक आव्हाने महापालिकेत आमच्या समोर आहेत .२४ बाय ७ सारखा एक प्रकल्प असेल ,जायकासारखा नदी सुधार प्रकल्प असेल ,रिव्हर फ्रंट सारखा या शहराची जीवनदायी नदी तिचे पुनर्जीवन प्रकल्प असेल,सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी राजकीय इच्छ्याशक्ती दाखविण्याची गरज असेल ,ते छोटी मोठी गल्ली बोळे कॉन्क्रीटीकरणाची कामे असतील ती सारी आम्ही करू शकतो , जायका हा विषय असा आहे,वरची सगळी धरणे जी शेतीसाठी बांधली होती . त्यातून शहरासाठी पाणी देताना त्याबदल्यात त्यातील ७० टक्के पाणी शुद्ध करून ते नदीत सोडण्याचे बंधन घातले गेले होते . पण गेली ४० वर्षे त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले गेले .साधा डीपीआर सुद्धा त्यावेळेच्या सरकारने केला नाही . मोठे प्रकल्प करताना निधीची कायम कमतरता असते,परंतु राजकीय इच्छया शक्ती दाखविण्याची गरज त्यासाठी असते ती भाजपने दाखविण्याचा प्रयत्न केला . आणि जायका सारख्या प्रकल्पाला तब्बल ९०० कोटी चा निधी अनुदान म्हणून दिला .या भारतात गंगेनंतर एखाद्या नदीच्या सुधारणेसाठी दिलेला हा सर्वाधिक नदी आहे. २४ बाय ७ म्हणजे निव्वळ पाणी देणे असाच नाही हे समजून घ्यायला हवे,तर आजपर्यंत पाणीपुरवठ्यात होणारी गळती २५ ते ३० टक्के होत आली .त्यामुळे आपण १४ टीएमसी पाणी उचलूनही अडचणी येत राहिल्या . हि गळती रोखून सर्वांना समप्रमाणात ,समदाबाने पाणी देण्याची २४ बाय ७ हि योजना आहे. प्रत्येक योजना येताना अडथळे येतात .अशा अडचणी अडथळे यांच्यावर मात करण्याची इच्छ्याशक्ती भाजपा दाखविते आहे . आणि असे अडथळे पार करीत आम्ही वेगाने हि योजना गतीने पुढे नेत आहोत . आपल्याकडे सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडलेला आहे. ५ वर्षापूर्वी बसेस घेताना डाव्या बाजूच्या दरवाजाच्या घ्याव्यात कि त्या उजव्या बाजूच्या दरवाजाच्या घ्याव्यात यासाठी दोन कॉंग्रेस मध्ये 3 वर्षे वाद होते. अशाप्रकारच्या गोष्टींमुळे विकास साधता येत नाही .परंतु भाजपाने देवेंद्र फडणविसांच्या नेतृत्वाखाली राजकीय इच्छया शक्ती दाखविली .आणि आता १००० बसेस चा ताफा पीएमपी च्या ताफ्यात येतो आहे.त्या सुद्धा डीझेल वरून आपण सीएनजी वर आलो सीएनजी वरून इलेक्ट्रिक बसेस वर आलो काळानुसार अपना बदल घडवीत आलो . सर्वांना बरोबर घेऊ आणि गरज पडेल तिथे आम्ही संख्याबळाचा वापर करून विकासाची गती वाढवू , हि जबाबदारी मला दिली आहे ती मी निश्चितपणे पार पाडेल . पुणे शहर वाढते आहे ,मुंबईपेक्षा हि क्षेत्रफळ वाढते आहे, केंद्राने पुणे शहराला दिला तसा निधी मुक्त हाताने राज्य सरकारनेही द्यावा .ते देतील कि नाही ते मी सांगू शकत नाही . त्यातूनही निकड असेल तर पीपीपी ,डीफरड पेमेंट सारख्या युक्त्यां वर रस्ते करता येतील का ते पाहू . गावांच्या समावेश बाबत ते म्हणाले ,’ खरे तर १९९५ सालीच हि गावे आम्ही युती सरकारच्या काळात शहरात आणली होती . पण तेव्हा जणू त्यावेळेचे सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी जणू गिळायला निघालेत अशी भूमिका राष्ट्रवादी ने मांडत, दिशाभूल करायचे काम करून विरोध निर्माण केला . परंतु आता हि गावे अनधिकृत बांधकामांनी बकाल झाल्यावर आता ते या गावांबाबत कळवळा आल्याचे दाखवीत आहेत .आणि गावे घ्या म्हणू लागलेत , गावे घ्यायला विरोध कोणाचाही नाहीच .परंतु त्या गावांच्या व्यवस्थित विकासासाठी जे काही पैसे लागतील ते सुद्धा राज्य सरकारने द्यावेत ,राज्य सरकारने त्याच गावांमधून पीएमआरडी च्या माध्यमातून गोळा केलेला महसूल त्या गावांपुरता महापालिकेला द्यावा ,अशी आमची मागणी आहे ,मात्र त्यामुळे या गावांचा विकास रखडता कामा नये याची दक्षता भाजपा घेणार आहेच. २४ बाय ७ च्या प्रकल्पाची अंतिम मुदत २०२३ सालची आहे , पण येणाऱ्या अडचणी पाहून तो थोडा लांबणार आहे ,हे पाहून आम्ही किमान 2 भाग रोल मॉडेल सारखे तयार करून दाखविण्याचा प्रयत्न आमचा असेल. काही अद्यावत रस्ते असतील , पूल असतील , नदी सुधार प्रकल्प आणि जायकाचा प्रक ल्प यांचे जागेवर काम करून किमान ४ /५ एसटीपी उभे करणे यंदा आमचे उद्दिष्ट्य आहे. या शहराला विकास काय असतो, तो कशा माध्यमातून केला जातो ,या साठी गेली ४ वर्षे आम्ही जे प्रयत्न केले याचे रोल मॉडेल दाखविण्याचे प्रयत्न जबाबदारी मुख्यतः माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर आहे . ते आम्ही समर्थतेने दाखवून देऊ .जायका चे काम पूर्ण झाल्यावर जवळपास ७ टीएमसी, म्हणजे ५ वेळा खडकवासला भरेल एवढे पाणी आम्ही शुद्ध करून नदीत सोडणार आहोत, गावे समाविष्ट झाल्याने आम्हाला पाण्याचा कोटा वाढवून घ्यावा लागेल, पण २४ बाय ७ संपूर्ण पणे अस्तित्वात आले तर आलेल्या गावांसह १२ टीएमसी पाणी सुद्धा आपल्याला पुरू शकेल .आजच आपण १४ टीएमसी पाणी घेतो.कचऱ्याच्या सुधारित वर्गीकरणानुसार प्रक्रिया प्रकल्पाबाबत हि पुणे भारतातील पहिल्या ५ क्रमांकातील शहर आज आहे, मेट्रो सुद्धा आपला पहिला टप्पा या वर्षात सुरु होईल असा आमचा पुरेपूर आमचा प्रयत्न आहे ,या सर्वासाठी राज्य सरकारच्या सकारात्मक प्रतिसादाची मात्र आम्हाला गरज आहे आणि तो मिळेल म्हणजे आम्ही हे निश्चितपणे हे टार्गेट पूर्ण करू असेही गणेश बिडकर यांनी म्हटले आहे.